शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तणनाशक फवारल्याने पिकेच करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:33 IST

पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिकेच करपल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. प्रामुख्याने सोयाबीन पिकाला तणनाशकाचा फटका बसला असून, कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करण्यासह संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मानोरा, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यात ५० एकर क्षत्रातील पिके निकृष्ट तणनाशकामुळे करपली आहेत.वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या ९ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण अधिक आहे. जल्ह्यात सद्यस्थितीत २ लाख ४४ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ५२ हजार १३८ हेक्टर क्षेत्रावर तूर, २० हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, ७ हजार २४६ क्षेत्रावर उडिद, तर ५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर मुग या प्रमुख पिकांसह ज्वारी, मका, सुर्यफुल, ऊस आणि इतर पिकांचीही काही प्रमाणात पेरणी झाली आहे. आता पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे. मानोरा तालुक्यातील खापरी, गिर्डा येथील १५, मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील दोन आणि वाशिम तालुक्यातील एक शेतकरी मिळून एकूण १८ शेतकºयांना निकृष्ट तणनाशक फवारणीचा फटका बसला असून, या सर्वांचे मिळून ५० पेक्षा अधिक एकर क्षेत्रातील पिक करपले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनतण नियंत्रणासाठी फवारणी केलेल्या औषधामुळे पिकेच करपल्याने आर्थिक नुकसान झालेल्या मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केली असून, या प्रकरणी संबंधित कृषीसेवा केंद्र आणि तणनाशक निर्मात्या कंपनीवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी