शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

वादळवारा, अवकाळी पावसामुळे ५१० एकरातील पिकांचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:38 IST

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली.

वाशिम :  एकामागून एक कोसळणाऱ्या संकटापुढे शेतकरी पुरता गारद झाला असून, गत दोन दिवसांतील अवकाळी पाऊस, गारपिट व वादळवाऱ्यामुळे ५१० एकरातील ( २०४ हेक्टर) पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली. वादळवाऱ्याचा जोर प्रचंड असल्याने पपई, संत्रा यांसह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहोरही गळून पडला. हवामान खात्याने ५ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. या संकेतानुसार सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागात वादळवाऱ्यासह गारपिट, तुरळक पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण, वादळवारा आणि तुरळक पाऊस झाल्याने गारठा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळवाऱ्यामुळे संत्रा, पपई, लिंबू, आंब्याचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आर्थिक संकटच कोसळले. हातातोंडाशी आलेला घास वादळवारा, गारपिट व अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

वादळवारा, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एका गोऱ्हाचा मृत्यू झाला. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Rainपाऊस