शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

अतिथंडीमुळे पिकांचे नुकसान;  पंचनाम्यासंदर्भात मागविले मार्गदर्शन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 14:53 IST

वाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे. यासंदर्भात भाजपा पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन दिले होते.२५ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका, हरभरा यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील एकलासपूर, वाकद, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मुंगळा यासह मानोरा, कारंजा, वाशिम तालुक्यातही हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिकांना कडाक्याच्या थंडीचा फटका बसला होता. हळद, हरभरा, मका, कोबी, मेथी व अन्य भाजीपालावर्गीय गटातील बहुतांश पिके करपून गेल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले. नुकसानग्रस्त पिकांचे स्थळ निरीक्षण तसेच पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्याकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने १८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविले असून, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्याचे आदेश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन येताच, जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती