शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी ...

ठळक मुद्देअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून रविवारी मिळाली.माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने या नुकसानाची संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे शासनाकडून प्रचलित दरानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून १० जुलै रोजी रक्कमही मंजूर केली. प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११५८ शेतकºयांचे ६२४.६७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील २५५ शेतकºयांचे ११५.६३ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यातील ७३ शेतकºयांचे २६.०४ हेक्टर अकोला जिल्ह्यातील २० शेतकºयांचे १०.७० हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यातील २ शेतकºयांचे १.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पाचही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. सदर मदतीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयास पूर, चक्रीवादळ, पीक नुकसान, तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी उपलब्ध तरतुदीतून करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधित अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानासाठी आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली आहे; परंतु आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.- बाळासाहेब बोराडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी