शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी ...

ठळक मुद्देअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून रविवारी मिळाली.माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने या नुकसानाची संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे शासनाकडून प्रचलित दरानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून १० जुलै रोजी रक्कमही मंजूर केली. प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११५८ शेतकºयांचे ६२४.६७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील २५५ शेतकºयांचे ११५.६३ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यातील ७३ शेतकºयांचे २६.०४ हेक्टर अकोला जिल्ह्यातील २० शेतकºयांचे १०.७० हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यातील २ शेतकºयांचे १.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पाचही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. सदर मदतीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयास पूर, चक्रीवादळ, पीक नुकसान, तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी उपलब्ध तरतुदीतून करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधित अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानासाठी आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली आहे; परंतु आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.- बाळासाहेब बोराडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी