शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी ...

ठळक मुद्देअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून रविवारी मिळाली.माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने या नुकसानाची संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे शासनाकडून प्रचलित दरानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून १० जुलै रोजी रक्कमही मंजूर केली. प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११५८ शेतकºयांचे ६२४.६७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील २५५ शेतकºयांचे ११५.६३ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यातील ७३ शेतकºयांचे २६.०४ हेक्टर अकोला जिल्ह्यातील २० शेतकºयांचे १०.७० हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यातील २ शेतकºयांचे १.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पाचही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. सदर मदतीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयास पूर, चक्रीवादळ, पीक नुकसान, तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी उपलब्ध तरतुदीतून करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधित अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानासाठी आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली आहे; परंतु आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.- बाळासाहेब बोराडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी