शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धुळीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:55 IST

वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. 

दुचाकीधारकही त्रस्त: मातीमिश्रीत मुरुमाच्या वापराचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात असलेल्या रस्ता कामांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-हिंगोली , वाशिम-यवतमाळ, महान आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गाचे काम करण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रीटचे हे रस्ते चौपदरी करण्यात येत असून, या मार्गाचे कंत्राट परराज्यातील बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर मुरूम या गौणखनिजाचा वापर करून समतलीकरण करण्यात येत आहे. तथापि, वापरण्यात येत असलेल्या या मुरुमात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ही माती वाहनांच्या वर्दळीमुळे उडून पिकांवर बसत आहे. यामुळे पाने धुळीने माखली जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पाने हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम करतात; परंतु त्यावर धुळ बसत असल्याने पिके सुकत चालली आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी झालेली असली तरी, वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील शेतांत खरीपातील तुरीचे प्रमाणच अधिक असल्याने सर्वाधिक फटका याच पिकाला बसत आहे. दरम्यान, वाहनांमुळे उडणारी धुळ डोळ्यात जात असल्याने दुचाकीचालकांनाही याचा त्रास होत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकMangrulpirमंगरूळपीर