शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धुळीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:55 IST

वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. 

दुचाकीधारकही त्रस्त: मातीमिश्रीत मुरुमाच्या वापराचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात असलेल्या रस्ता कामांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-हिंगोली , वाशिम-यवतमाळ, महान आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गाचे काम करण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रीटचे हे रस्ते चौपदरी करण्यात येत असून, या मार्गाचे कंत्राट परराज्यातील बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर मुरूम या गौणखनिजाचा वापर करून समतलीकरण करण्यात येत आहे. तथापि, वापरण्यात येत असलेल्या या मुरुमात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ही माती वाहनांच्या वर्दळीमुळे उडून पिकांवर बसत आहे. यामुळे पाने धुळीने माखली जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पाने हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम करतात; परंतु त्यावर धुळ बसत असल्याने पिके सुकत चालली आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी झालेली असली तरी, वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील शेतांत खरीपातील तुरीचे प्रमाणच अधिक असल्याने सर्वाधिक फटका याच पिकाला बसत आहे. दरम्यान, वाहनांमुळे उडणारी धुळ डोळ्यात जात असल्याने दुचाकीचालकांनाही याचा त्रास होत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकMangrulpirमंगरूळपीर