शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:33 IST

संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हयाचा ग्रीन झोनमध्ये समावेश असला तरी परजिल्हयातून आलेले वाशिम रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, दिवसेंदिवस वाढत असलेले संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. याकरिता विशेष खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार असून प्रशासन कौतूकास्पद काम करीत आहे यात तिळमात्र शंका नाही.वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला बहुतांशी यश आले आहे. जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील एकमेव कोराना बाधित रुग्ण व नुकताच वर्धा येथे आढळलेला मंगरुळपीर तालुकयातील रुग्ण वगळता जिल्हयातील नागरिकांना कोरोना विषाणुची लागण झालेली नाही. मालेगाव तालुक्यातील रुग्ण बरा होउन घरी गेला असून मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण वर्धा येथे उपाचर घेत आहे. याव्यतिरिक्त वाशिम जिल्हयात उत्तरप्रदेशमधील एका ट्रकचा क्लिनर ज्याचा कोरोना पॉझिटीव्ह असतांना मृत्यू झाला व त्याच्या संपर्कातील ट्रकचालक जो उपचार घेत आहेत . परंतु प्रशासनाच्यावतिने विशेष खबरदारी घेतल्या जात असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये दिसून येत असला तरी शहरातील दररोज वाढती गर्दी पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे अन्यथा ग्रीन झोनमधून वाशिम जिल्हा रेडझोनमध्ये यायला वेळ लागणार नसल्याची चर्चा होत आहे.जिल्हयात दररोज चिंता वाढविणाºया व दिलासा देणाºया बातम्या झळकत आहेत. कारंजातील एका कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने पाठविल्यानंतर जिल्हावासियांची चिंता वाढली होती परंतु सर्वाचे अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला. आता मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने या तालुकयाची चिंता वाढली आहे. यांच्या संपर्कातील सात जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले असून संपूर्ण गावाची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. यांचा अहवाल येईपर्यंत जिल्हयावर टांगती तलवार आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. यासोबतच रिसोड तालुकयातील पंचाबा येथील संदिग्ध रुग्णास दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हयात दररोज शेकडो मजुर दाखल होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढलेली दिसून येत आहे.

- परजिल्हयात अडकलेल्या नागरिकांची तपासणी करुन घ्यावी!वाशिम जिल्हयातील काही मजूर, नागरिक इतर जिल्हयात अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात येण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने अनेक मजूर, नागरिक जिल्हयात दाखल होत आहेत. ते जिल्हयात दाखल झाल्याबरोबर त्यांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. परंतु परस्पर तपासणी न करता कोणी येत असेल तर नागरिकांनी प्रशासनास कळविणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या