शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus : नागरिकांनो, सुरक्षितता बाळगा - हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:45 IST

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यासह देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत मात्र वाशिम जिल्ह्यात गत २२ दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. तसेच मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अंतीम अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. कौतुकास्तपद बाब म्हणजे केंद्र सरकारने २१ एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबाबत कौतूक केले. त्यात वाशिम जिल्ह्याचा समावेश होता. या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

जिल्ह्यात ‘कोरोना’ला प्रतिबंधासाठी कुठल्या उपाययोजना राबविल्या?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करून जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणारी वाहने व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कायदा मोडणाºया अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करून परराज्य, महानगरातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यानुसार, नागरिकांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करून संदिग्ध असल्यास १४ दिवस घरातच अलगीकरण करून राहण्याचा सल्ला संबंधितांना देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

परजिल्ह्यातून किती मजूर परतले?रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. संबंधितांचा ‘होम क्वारेंटिन’ कालावधी संपुष्टात आला असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे, पण या नागरिकांनी यापुढेही आरोग्यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना सुरक्षेसंबंधी नागरिकांना काय संदेश द्याल ?मेडशी (ता. मालेगाव) येथील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा अंतीम थ्रोट स्वॅब अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. असे असले तरी आगामी काही दिवसांत ‘कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून नागरिकांनी त्याचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या