शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नागरिकांनो, सुरक्षितता बाळगा - हृषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:45 IST

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यासह देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत मात्र वाशिम जिल्ह्यात गत २२ दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. तसेच मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अंतीम अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. कौतुकास्तपद बाब म्हणजे केंद्र सरकारने २१ एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांनी राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबाबत कौतूक केले. त्यात वाशिम जिल्ह्याचा समावेश होता. या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद...

जिल्ह्यात ‘कोरोना’ला प्रतिबंधासाठी कुठल्या उपाययोजना राबविल्या?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करून जिल्ह्यात विनापरवाना दाखल होणारी वाहने व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कायदा मोडणाºया अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करून परराज्य, महानगरातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली. त्यानुसार, नागरिकांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करून संदिग्ध असल्यास १४ दिवस घरातच अलगीकरण करून राहण्याचा सल्ला संबंधितांना देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

परजिल्ह्यातून किती मजूर परतले?रोजगारासह विविध कारणांमुळे महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ कामगार, मजूर हे ३१ मार्चपर्यंत आपापल्या गावी परतले आहेत. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. संबंधितांचा ‘होम क्वारेंटिन’ कालावधी संपुष्टात आला असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे, पण या नागरिकांनी यापुढेही आरोग्यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना सुरक्षेसंबंधी नागरिकांना काय संदेश द्याल ?मेडशी (ता. मालेगाव) येथील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा अंतीम थ्रोट स्वॅब अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. ही जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. असे असले तरी आगामी काही दिवसांत ‘कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून नागरिकांनी त्याचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतcorona virusकोरोना वायरस बातम्या