शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरोनामुक्त ग्रामपंचायतींना मिळणार लाखोंची बक्षिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 12:07 IST

Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य या संकटातून बाहेर पडावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेची आखणी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होऊन महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्ग तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात होण्याचा धोका वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोविडसंबंधी चाचण्या होणे व गावातच संस्थात्मक विलगीकरणाच्या नियमाची चोख अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला, हगवण, डोकेदुखी, मधुमेह, अशक्तपणा, फुप्फुसांचे आजार असणाऱ्या रुग्णांना तातडीने कोविड तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, येत्या काळात लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, तसेच पिण्याचे पाणी, शौचालय, पंखे, आदी सुविधा असलेल्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित करणे, अशा इमारतींमध्ये किमान १० बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिम