शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:01 IST

एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात परतलेले ३१ हजार आणि लॉकडाऊननंतर ते ८ जूनपर्यंत परतलेल्या ४७३५२ अशा एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने अशा नागरिकांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाने मार्च महिन्यापासून देशासह राज्यात धुमाकूळ घातला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन लावला. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले होते. या नागरिकांना होम क्वारंटीन केले होते. यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्याने १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २४ मार्च ते ८ जून २०२० या कालावधीत ४७ हजार ३५२ नागरिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस क्वारंटीन केले. यापैकी ४१८४० नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपला असून, सध्या ५५१२ नागरिक क्वारंटीन आहेत. दुसºया टप्प्यात वाशिम तालुक्यात ६२६१ नागरीक परतले. यापैकी ५९८१ जण क्वारंटीनमुक्त झाले असून, सध्या २८० नागरिकांना क्वारंटीन आहेत. कारंजा तालुक्यात५८५३ नागरीक परतले. यापैकी ४३३४ जण क्वारंटीनमुक्त असून, १५१९ नागरिकांना क्वारंटीन आहेत.मालेगाव तालुक्यात ६९४३ नागरीक परतले. यापैकी ४७२० जण क्वारंटीनमुक्त असून, २२२३ नागरिकांना क्वारंटीन आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ५७६४ नागरीक परतले. यापैकी ५२३० जण क्वारंटीनमुक्त असून, ५३४ नागरिक क्वारंटीन आहेत.रिसोड तालुक्यात १३७७६ नागरीक परतले आहेत. यापैकी १३०८८ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या ६८८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नागरीक रिसोड तालुक्यात परतले असून, तेथे विशेष दक्षता घेतली जात आहे. मानोरा तालुक्यात २६८ जण क्वारंटीनमानोरा तालुक्यात ७५५ नागरीक परतले आहेत. यापैकी ८४८७ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या २६८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कठोर अंमलबजावणीक्वारंटीन असलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये अन्यथा गुन्हे दाखल केली जातील, असे निर्देश असून याची अंमलबजावणी सुरू असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या