शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:01 IST

एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात परतलेले ३१ हजार आणि लॉकडाऊननंतर ते ८ जूनपर्यंत परतलेल्या ४७३५२ अशा एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने अशा नागरिकांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाने मार्च महिन्यापासून देशासह राज्यात धुमाकूळ घातला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन लावला. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले होते. या नागरिकांना होम क्वारंटीन केले होते. यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्याने १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २४ मार्च ते ८ जून २०२० या कालावधीत ४७ हजार ३५२ नागरिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस क्वारंटीन केले. यापैकी ४१८४० नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपला असून, सध्या ५५१२ नागरिक क्वारंटीन आहेत. दुसºया टप्प्यात वाशिम तालुक्यात ६२६१ नागरीक परतले. यापैकी ५९८१ जण क्वारंटीनमुक्त झाले असून, सध्या २८० नागरिकांना क्वारंटीन आहेत. कारंजा तालुक्यात५८५३ नागरीक परतले. यापैकी ४३३४ जण क्वारंटीनमुक्त असून, १५१९ नागरिकांना क्वारंटीन आहेत.मालेगाव तालुक्यात ६९४३ नागरीक परतले. यापैकी ४७२० जण क्वारंटीनमुक्त असून, २२२३ नागरिकांना क्वारंटीन आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ५७६४ नागरीक परतले. यापैकी ५२३० जण क्वारंटीनमुक्त असून, ५३४ नागरिक क्वारंटीन आहेत.रिसोड तालुक्यात १३७७६ नागरीक परतले आहेत. यापैकी १३०८८ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या ६८८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नागरीक रिसोड तालुक्यात परतले असून, तेथे विशेष दक्षता घेतली जात आहे. मानोरा तालुक्यात २६८ जण क्वारंटीनमानोरा तालुक्यात ७५५ नागरीक परतले आहेत. यापैकी ८४८७ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या २६८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कठोर अंमलबजावणीक्वारंटीन असलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये अन्यथा गुन्हे दाखल केली जातील, असे निर्देश असून याची अंमलबजावणी सुरू असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या