शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोरोनाला वाकुल्या दाखवित उडाला एक हजारावर लग्नांचा बार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST

वाशिम : गतवर्षभरापासून कोरोनाचे संकट असून, यामुळे लग्नसराईवर मर्यादा आल्या आहेत. असे असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १०२ ...

वाशिम : गतवर्षभरापासून कोरोनाचे संकट असून, यामुळे लग्नसराईवर मर्यादा आल्या आहेत. असे असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १०२ लग्न सोहळे पार पडले. ग्रामीण भागात मात्र लग्न सोहळ्यासाठी परवानगी घेणे शक्यतो टाळले जात असल्याने याची कुठेही नोंद नाही.

कोरोनाचा सर्वच क्षेत्राला जबर फटका बसला तसेच लग्न समारंभावरही मर्यादा आल्या. लग्न सोहळ्यासाठी पोलीस, तहसील प्रशासनाची परवानगी, याशिवाय उपस्थिती मर्यादाही आहे. त्यामुळे २०१९च्या तुलनेत २०२० - २१ या वर्षात लग्न सोहळ्यांचे प्रमाण कमी झाले तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न सोहळ्यांसाठी शक्यतो परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे याची नोंद नसल्याने लग्न सोहळ्याचा आकडा कमी असू शकतो. वाशिम जिल्ह्यात दरवर्षी किमान अडीच ते तीन हजारांपेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडत असतात, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. मागील वर्षी ऐन लग्न हंगामात कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. यामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यावेळी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत मंगल कार्यालये बंदच होती. नोव्हेंबरपासून ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्न सोहळा पार पाडण्याचा नियम लागू करण्यात आला. पहिले नगर पालिका, पोलीस स्थानक, तहसीलदार आदींची परवानगी घेऊनच मंगल कार्यालयात लग्न सोहळे पार पडले जाऊ लागले. मात्र, काही लग्न सोहळ्यांत नियम पायदळी तुडवत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाल्याने त्या वधू- वराच्या वडिलांवर व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. ५० जणांची मर्यादा पाळून जिल्ह्यात लग्न सोहळे पार पडले. आता तर लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर आणखी मर्यादा आली. २५ जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा लागतो. विवाह प्रसंगी कार्यालयाचे भाडे, जेवण, बस्ता व सोने यावरच जास्त खर्च केला जातो. वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने जेवणावळीवरील खर्च थोडा कमी झाला.

००

चौकट

एप्रिल कठीणच

जिल्ह्यात लहान, मोठी १००च्या जवळपास मंगल कार्यालये, लॉन आहेत. ‘ब्रेक द चेन’ सुरू झाल्याने नियम आणखी कडक करत लग्नात २५ जणांनाच परवानगी दिली आहे. प्रत्येक मंगल कार्यालयात मार्च महिन्याच्या ५ ते ६ तारखा बुक झाल्या होत्या. या महिन्यात होणारे काही लग्न सोहळे रद्द करण्यात आले व तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

००००००

मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया

गेल्यावर्षी जवळपास पाच ते सहा महिने मंगल कार्यालये बंदच होती. गत तीन, चार महिन्यांपासून मंगल कार्यालये सुरू झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याने परिस्थिती बिकट आहे. लग्नाच्या तारखा बुक झाल्या होत्या. काहींनी लग्न तारखा पुढे ढकलल्या.

- शिवाजी वाटाणे

संचालक, मंगल कार्यालय, वाशिम

०००

कोरोनामुळे लग्न समारंभावर मर्यादा आल्या. गेल्या वर्षीदेखील कमी प्रमाणात लग्न झाले. आता पुन्हा कोरोनाचे संकट असल्याने म्हणावे तेवढे लग्न समारंभ नाहीत. फारशी बुकींगही नाही. लग्न समारंभ उपस्थितीवरही मर्यादा आहेत.

- लोथ

संचालक, मंगल कार्यालय, वाशिम

०००००

चौकट

वर्षभरात ६१ लग्नतिथी

पंचांगानुसार वर्षभरात ६१ लग्नतिथी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै यादरम्यान ३२, तर नोहेंबर २०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान २९ लग्नतिथी आहेत. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आणि परवानगीची किचकट प्रक्रिया असल्याने अनेकजण लग्न सोहळे पुढे ढकलत असल्याचे दिसून येत आहे.

०००००००

२०० जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना वऱ्हाडी बोलावण्यापेक्षा सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी विवाह करण्याचा निर्णय काही वधू - वरांनी घेतला. मागील वर्षभरात २०० जणांनी विवाह नोंदणी केल्याची माहिती आहे.