शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना : बाजार समित्यांसह उपबाजारांतील व्यवहार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:13 IST

तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी ३० मार्च रोजी दिला. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे तीन बाजार समित्यांसह दोन उपबाजारांचे व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत होऊ शकले नाहीत. आता कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाजार समित्यांत आवश्यक उपाय योजना सुरू असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रवि गडेकर यांनी मंगळवारी दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांतील धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तथापि, पणन सचांलक, पणन संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २६ आणि २७ मार्च रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकान्वये सर्व बाजार समित्यांत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊन जिवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी हृषिकेष मोडक यांनी जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी गर्दी कमी करणे, आवश्यक खबरदारी घेण्याच्या अटींवर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींमध्ये जीवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहार सुरु ठेवण्याचा आदेश ३० मार्च रोजी दिला. त्यानंतर मालेगाव आणि कारंजा येथील बाजार समित्यांत व्यवहार सुरूही झाले. तथापि, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा आणि रिसोड येथील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, मंगरुळपीरचा उपबाजार असलेल्या शेलुबाजार येथे मंगळवारी ५० क्विंटल शेतमालाची खरेदी झाली. आता सर्व बाजार समित्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत सर्व बाजार समित्यांतील व्यवहार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम