शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

२७00 एकरावर सिंचनाची सोय

By admin | Updated: July 31, 2015 01:05 IST

‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पातंर्गत वाशिम जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश.

वाशिम : मानव विकास मिशन अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रकल्पातून १८ गावांतील २७00 एकरावरील सिंचनाची सोय झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिके करपली जात आहेत. यामध्ये ज्या गावांमध्ये ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे, त्या गावातील पाण्याची पातळी वाढलेली असून, याद्वारे या भागातील पिके डौलदार स्थितीत असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक बळवंत गजभिये यांनी दिली. जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला असून, यामध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड तालुक्यातील प्रत्येकी पाच व मंगरुळपीर तालुक्यातील तीन असे एकूण १८ गावांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील वाळकी, बिटोडा तेली, पांडवउमरा, दोडकी, सोयता, मालेगाव तालुक्यातील अनसिंग, वाकद, वाघजूळ, ब्राम्हणवाडा, शेलगाव खवले, मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी, खडी, सार्सी व रिसोड तालुक्यातील वाकद, पार्डी तिखे, कंकरवाडी, सायखेडा, लेहणी या गावांचा समावेश आहे. या गावातील ह्यआपलं गाव, आपलं पाणीह्ण या प्रयोगामुळे भूजलाचे पुनर्भरण तर झालेच, शिवाय पाणीटंचाईवरसुद्धा मात झाली आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवल्याने पावसाने दडी मारलेल्या काळात याचा उपयोग शेतकर्‍यांना होत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील १८ गावांमध्ये हा प्रकल्प राबवून कुठेही पाणी वाहून न जाता, त्या-त्या गावात सिमेंट बंधारे बांधण्यात आलेत. याचा उपयोग जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होत आहे. २0१३ मध्ये प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील चार गावांमध्ये राबविण्यात आला. याचा फायदा पाहता २0१४-२0१५ मध्ये १८ गावे समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे गावातील हातपंप, विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.