शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

महामार्गावरील पुलांची उभारणी वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:35 IST

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पुढे पावसासह इतर कारणांनी अडचणीत येऊ नयेत म्हणून या मार्गावरील पुलांची उभारणी वेगाने करण्यात येत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पुढे पावसासह इतर कारणांनी अडचणीत येऊ नयेत म्हणून या मार्गावरील पुलांची उभारणी वेगाने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारांमार्फत राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मंगरुळपीर-आर्णी, महान-मंगरुळपीर, वाशिम-मंगरुळपीर, कारंजा-मंगरुळपीर आदि मार्गांचा समावेश आहे. या मार्गावर असलेल्या लहान, मोठ्या पुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. ही कामे दोन वर्षे चालणार आहेत. त्यामुळे पुढे पावसाने अडचणी येऊ शकतात, तसेच हे सर्व मार्ग सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याने समतलीकरण महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या कामांमुळे वाहनधारकांना अडचणी येऊ नयेत म्हणून पुलांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वळणमार्गही तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनधारकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. दरम्यान, या मार्गाच्या समतलीकरणासाठी मुरुमाची दबाई करताना पाण्याचा वापर होत नाही, तसेच मुरूम माती मिश्रीत असल्याने यातील धुळ मोठ्या प्रमाणात उडून वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे, तसेच शेतशिवारातील पिकांवरही धूळ बसत असल्याने पिके सुकत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग