शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मराठा आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:44 AM

वाशिम : मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ५ मे रोजी दिला. यामुळे ...

वाशिम : मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ५ मे रोजी दिला. यामुळे सर्वच स्तरातून नाराजीचा सूर उमटत असून, मराठा आरक्षण मिळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत तसेच केंद्र सरकारने घटनेत दुरुस्ती करावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

००००

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण मराठा समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. देशातील इतर राज्यात ६०, ७० टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलेले असताना त्या धर्तीवर मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळावयास पाहिजे होते. न्यायालयाने जरी मराठा आरक्षण रद्द केले असले तरी मराठा समाजाचा दावा काही संपुष्टात आलेला नाही. ही लढाई अजून भक्कमपणे लढावी लागणार आहे.

- भावना गवळी

खासदार

.....

या निर्णयाचा फटका आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांना बसणार आहे. मराठा आरक्षणप्रकरणी जोपर्यंत केंद्र सरकार हस्तक्षेप करीत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण लागू होणार नाही. यासाठी घटनेत दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा आरक्षण मिळणे दुरापास्त आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षणाच्या लाभापासून मराठा समाज वंचित झाला आहे.

- अ‍ॅड. किरण सरनाईक

आमदार

.........

देशातील आणखी काही राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मर्यादा असून, ते अंमलातदेखील आहे. मग महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंदर्भातच हा वेगळा न्याय का? इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवून मराठा आरक्षण लागू होणे अपेक्षित आहे.

- अमित झनक

आमदार

.......

५८ क्रांती मोर्चे, कायदेशीर लढाई, अनेक तरुणांचे बलिदान, मागासवर्गीय आयोगाने नोंदविलेले निरीक्षण याबाबत बाजू मांडण्यात सरकारला अपयश आलेले आहे. राज्य व केंद्र सरकार, राजकारण्यांनी मराठा समाजाचा घात केला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आरक्षणासंदर्भात सकल मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा समन्वयातून ठरविण्यात येईल.

- हुकूम पाटील तुर्के, जिल्हा समन्वयक

सकल मराठा क्रांती मोर्चा

.......

मराठा आरक्षणासंदर्भात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने गेल्या ३० वर्षांपासून मराठ्यांचे ओबीसीकरण करणे हीच भूमिका प्रामुख्याने मांडली आहे. परंतु मराठा समाजातील सत्तेत असलेली राजकीय व्यक्तींची मानसिकता नसल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळत नाही. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश हे आता राज्य सरकारच्या हातात आहे. ओबीसीमध्ये समावेश केला तरच आरक्षण टिकेल.

- गजानन भोयर

जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड वाशिम

...........

केंद्र सरकारने आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा किंवा राज्य सरकारने ओबीसीमध्ये आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा वाढवावी. ओबीसी - ब अशी वर्गवारीसुद्धा आरक्षणात निर्माण करता येते. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने तात्काळ पुढाकार घ्यावा. मराठा सेवा संघाने मागील ३० वर्षांपासून मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी केली आहे. २७ टक्के ओबीसी आरक्षण ५२ टक्के करण्यात यावे.

अशोकराव महाले

विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ, अकोला विभाग

...........

इंदिरा सहानी केसच्या निकालाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय किंवा संसदेमध्ये रद्द होत नाही, तोपर्यंत ५० टक्क्याच्या वर दिलेल्या आरक्षणाला काहीही अर्थ राहत नाही. मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतरच मी ही बाजू स्पष्ट केली होती. आजच्या निर्णयामुळे त्यावेळी मी व्यक्त केलेले मत आज खरे ठरले आहे.

- विकास गवळी

जि.प. आरक्षणाचे याचिकाकर्ते.

............