शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

 पैसे भरूनही रखडल्या वाशिम जिल्ह्यातील पाच हजार कृषीपंप जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:42 IST

Washim Mahavitran News दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यानी महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्यापैकी ५११७ शेतकऱ्यानी रितसर पैसे भरूनही त्यांना दोन वर्षांपासून कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सलग दुसरा रब्बी हंगामही हातून जाणार आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी  महावितरणकडे अर्ज करीत आहेत. दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. तथापि, त्यापैकी ५ हजार ११७ शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे.   सौरपंपाबाबत अनेक शेतकरी अनुत्सूकज्या शेतकºयांनी मार्च २०१८ नंतर महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्या शेतकऱ्यांना पारंपरिक जोडणीसाठी योजना नसल्याने महावितरणने सौरपंप जोडणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. जे शेतकरी यासाठी तयार आहेत. त्यांना सौरपंप दिलेही जात आहेत. तथापि, अनेक शेतकरी या पर्यायाबाबत उदासीनच असून, पारंपरिक जोडणीसाठी त्यांना याबाबतचा निर्णय होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

महावितरण सध्या उच्च दाब वाहिनी योजना राबवित आहे. त्यात एका शेतकरी ग्राहकासाठी अडीच लाख खर्च येतो. यानुसार ३१ मार्चपूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले त्यांना जोडणी दिली जात आहे. तथापि, मार्च २०१८ नंतर कोणतीच योजना नसल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी देणे अशक्य झाले आहे.-पी. एम. राठोड,जनसंपर्क अधिकारी, 

टॅग्स :agricultureशेतीwashimवाशिमmahavitaranमहावितरण