शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:20 IST

अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  वाशिम जिल्ह्यातही शेजमीन खरडण्याच्या, तसेच मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. पिकांच्या या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु या संदर्भातील अतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ३७५०० प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी झाल्याने राज्यात हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी खरडल्या, तसेच पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यातही १५ ते २० आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन खरडून गेली, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. महसूल व कृषी विभागाने या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण करून संयुक्त पंचनामा तयार केला. या पंचनाम्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ४.५९ कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. आता शासनाने गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या नुकसानापोटी आर्थिक मदत म्हणून शासनाने ४६ कोटी ४५ लाख ८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास २५ जुलैच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली; परंतु खरडून गेलेल्या किंवा वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानासाठी मदत, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ ६११.४४ हेक्टर क्षेत्रासाठीच शासनाने २ कोटी २९ लाख २९ हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे केवळ पीक नुकसानासाठी मदत मिळणार की नाही, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती