शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:20 IST

अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  वाशिम जिल्ह्यातही शेजमीन खरडण्याच्या, तसेच मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. पिकांच्या या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु या संदर्भातील अतिवृष्टीने खरडलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ३७५०० प्रमाणे मदत देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत पीक नुकसान झालेल्या शेतकºयांत संभ्रम निर्माण झाला असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाच्या मदतीची प्रतिक्षा लागली आहे.गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी झाल्याने राज्यात हजारो शेतकºयांच्या शेतजमिनी खरडल्या, तसेच पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यातही १५ ते २० आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन खरडून गेली, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. महसूल व कृषी विभागाने या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण करून संयुक्त पंचनामा तयार केला. या पंचनाम्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ४.५९ कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. आता शासनाने गतवर्षी जुन ते आॅगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या नुकसानापोटी आर्थिक मदत म्हणून शासनाने ४६ कोटी ४५ लाख ८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास २५ जुलैच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली; परंतु खरडून गेलेल्या किंवा वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानासाठी मदत, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना केवळ ६११.४४ हेक्टर क्षेत्रासाठीच शासनाने २ कोटी २९ लाख २९ हजार रुपये मदत निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे केवळ पीक नुकसानासाठी मदत मिळणार की नाही, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांना पडला आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती