शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारित भावी पिढी निर्माण करण्याचा संकल्प- शांतीलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:35 IST

शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या राज्यभरात मूल्यवर्धन मेळावे घेतले जात आहेत. वाशिममध्येही २५ ते २७ फेब्रूवारीला हा मेळावा पार पडला. यानिमित्त शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

‘मूल्यवर्धन’संबंधी काय सांगाल?मूल्यवर्धन हा उपक्रम भारतीय राज्यघटना, शिक्षण हक्क कायदा २००९, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० यावर आधारित आहे. शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत, समग्र शाळा दृष्टीकोन (होल स्कूल अ‍ॅपरोच), सर्वसाधारण व्यवहार, दैनंदिन कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी शाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम, उपलब्ध असणाºया साधनसामग्रीनुसार आवश्यक बदल करून हा उपक्रम राबविता येतो.

मूल्यवर्धनातून नेमके काय निष्पन्न होणार?मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वत:ची प्रगती साधण्याची जाणीव निर्माण होते. स्वतंत्र, चिकित्सक आणि जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. स्वत:शी तसेच इतरांशी संबंधित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय ते शोधू शकतात. परस्परांमधील संबंध आदरयुक्त रितीने जोपासण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण होईल. कुटूंब, शाळा आणि स्थानिक समुदायाच्या भल्यासाठी ते कृतीशिल योगदान देऊ शकतील.

शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळतेय का?मागील १० वर्षातील मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रधानसचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक, एससीईआरटीचे संचालक, अधिकारी वर्ग, शिक्षणाधिकारी, डायट अधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील मूल्यवर्धन नोडल आॅफीसर, विस्तार अधिकारी  तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक आदींचा मूल्यवर्धन उपक्रमात सक्रीय सहभाग व अपेक्षित सहकार्य मिळत आहे.

उपक्रमातून कुठले उद्देश साध्य करण्याचे ध्येय आहे?सुरक्षित, भयमुक्त, सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे, बालकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे, बालस्नेही वातावरण असणारे, मुल्याधारित  क्षमता विकसीत करणाºया पद्धतींचा अवलंब करणारे वर्ग विकसीत करणे, आदी उद्देश समोर ठेवण्यात आले. बालस्नेही व विद्यार्थी केंद्रीत पद्धतीने आनंददायी वातावरणात  विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याव्दारे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे ही मुल्यवर्धन कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे.

टॅग्स :Shantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशनwashimवाशिमinterviewमुलाखत