शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

संस्कारित भावी पिढी निर्माण करण्याचा संकल्प- शांतीलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:35 IST

शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या राज्यभरात मूल्यवर्धन मेळावे घेतले जात आहेत. वाशिममध्येही २५ ते २७ फेब्रूवारीला हा मेळावा पार पडला. यानिमित्त शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

‘मूल्यवर्धन’संबंधी काय सांगाल?मूल्यवर्धन हा उपक्रम भारतीय राज्यघटना, शिक्षण हक्क कायदा २००९, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० यावर आधारित आहे. शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत, समग्र शाळा दृष्टीकोन (होल स्कूल अ‍ॅपरोच), सर्वसाधारण व्यवहार, दैनंदिन कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी शाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम, उपलब्ध असणाºया साधनसामग्रीनुसार आवश्यक बदल करून हा उपक्रम राबविता येतो.

मूल्यवर्धनातून नेमके काय निष्पन्न होणार?मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वत:ची प्रगती साधण्याची जाणीव निर्माण होते. स्वतंत्र, चिकित्सक आणि जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. स्वत:शी तसेच इतरांशी संबंधित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय ते शोधू शकतात. परस्परांमधील संबंध आदरयुक्त रितीने जोपासण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण होईल. कुटूंब, शाळा आणि स्थानिक समुदायाच्या भल्यासाठी ते कृतीशिल योगदान देऊ शकतील.

शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळतेय का?मागील १० वर्षातील मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रधानसचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक, एससीईआरटीचे संचालक, अधिकारी वर्ग, शिक्षणाधिकारी, डायट अधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील मूल्यवर्धन नोडल आॅफीसर, विस्तार अधिकारी  तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक आदींचा मूल्यवर्धन उपक्रमात सक्रीय सहभाग व अपेक्षित सहकार्य मिळत आहे.

उपक्रमातून कुठले उद्देश साध्य करण्याचे ध्येय आहे?सुरक्षित, भयमुक्त, सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे, बालकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे, बालस्नेही वातावरण असणारे, मुल्याधारित  क्षमता विकसीत करणाºया पद्धतींचा अवलंब करणारे वर्ग विकसीत करणे, आदी उद्देश समोर ठेवण्यात आले. बालस्नेही व विद्यार्थी केंद्रीत पद्धतीने आनंददायी वातावरणात  विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याव्दारे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे ही मुल्यवर्धन कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे.

टॅग्स :Shantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशनwashimवाशिमinterviewमुलाखत