शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 15:29 IST

ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या या संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचीच पाळी आली आहे.वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे कामकाज करीत आहेत. सन २०११ १२ मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ही ‘संग्राम’ योजनेंतर्गत या २२ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये याच संगणक परिचालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत केंद्रचालकाचे पद देऊन पुन्हा नियुक्त करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प सुरू केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयानुसार एका केंद्रचालकाना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापक ४५० रु., स्टेशनरीसाठी २७०० रुपये प्रति महिना आणि प्रशिक्षणसाठी १३०० रुपये व इतर मिळून एकुण १२,५०० रुपये कंपनी आकारते, तरे ग्रामपंचायत एका वर्षासाठी १ लाख ४७ हजार रुपये या कंपनीला देते.यामधूनच नियमित केंद्रचालकांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळते. त्यात टीडीएसच्या काही रक्कम कंपनी आपल्या खात्यात ठेवते. हे टीडीएस केंद्रवालकांनाही मिळणे अपेक्षीत असताना अद्याप कोणत्याच संगणक परिचालकाला हे टीडीएस मिळाले नाही.त्यातच या संगणक परिचालकांचे एप्रिल, मे, जुन आणि जुलै मिळून चार महिन्यांचे वेतन संबंधित कंपनीकडे थकले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह शासनाने या संगणक परिचालकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी संगणक परिचालक करीत आहेत. कामबंद आंदोलानाला प्रारंभ !गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांच्या समस्यांबाबत बोलताना १० दिवसांच्या आत सर्व समस्यांचा निपटारा करण्यासह संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता ८ महिने उलटले तरी, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच इतरही विविध मागण्या प्रलंबित असल्याने मंगरुळपीर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्तीचे आश्वासन दिले होते. आता ८ महिने झाले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाहीच उलट चार महिन्यांपासून आमचे मानधनही झाले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.-ज्ञानेश्वर मुखमालेमंगरुळपीर तालुकाध्यक्षसंगणक परिचालक संघटना

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत