शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

संगणक परिचालकांच्या आंदोलनामुळे महा ई-संवाद कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 14:17 IST

वाशिम जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वनमंत्र्यांच्या महा ई -संवाद कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला, तसेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेवरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांबाबत शासन उदासीन असून, प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत संगणक परिचालक हे पद कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता असताना शासनाने या महत्वाच्या निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील संगणक परिचालकांनी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील संगणक परिचालकही सहभागी आहे. अशात हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार २३ आॅगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी ‘महा ई संवाद’अंतर्गत थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मुनगंटीवार थेट चर्चा करणार होते; परंतु वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत संगणक परिचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे बहुतांश ग्रामपंचायतीत या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला. त्यातच शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या किसान मानधन योजनेच्या नोंदणीवरही याचा परिणाम होत असून, ग्रामस्थांनाही महत्त्वाची कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत.मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार सुरू !राज्य शासन संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांबाबत गंभीर नाही. वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून आणि वारंवार आंदोलने करूनही शासनाकडून दखल घेण्यात येत असल्याने संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून, मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे संगणक परिचालकांनी सांगितले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत