शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पीकविम्यापोटी केवळ ४९.२१ रुपयांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

भरपाईसाठी शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना फायद्याची आहे, मात्र गत दोन वर्षांपासून पीक विमा कंपनी शेतकऱ्याची थट्टा करीत असून, काजळेश्वर ...

भरपाईसाठी शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना फायद्याची आहे, मात्र गत दोन वर्षांपासून पीक विमा कंपनी शेतकऱ्याची थट्टा करीत असून, काजळेश्वर येथील शेतकरी नितीन उपाध्ये यांना पीकविम्यापोटी केवळ ४९.२१ रुपये रक्कम मंजूर करण्याचा प्रताप कंपनीने केला आहे .

शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कवच मिळावे, त्यांना नुकसान भरपाईचा आधार व्हावा, म्हणून शासन प्रशासन पीकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करते. शेतकरीही या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये भरून पिकांना विम्याचे कवच देतात, तर नैसर्गिक आपत्तीने पीक नुकसान झाल्यानंतर प्रशासन आणि कंपनीच्या सूचनेनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून ७२ तासांच्या आत कंपनीला नुकसानाची माहिती देतात. गतवर्षी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यापैकी अनेकांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळाला नाहीच, तर पीकविमा मंजूर करताना अनेक शेतकऱ्यांची क्रूरथट्टा कंपनीकडून केली जात आहे. असाच प्रकार काजळेश्वर येथील शेतकरी नितीन उपाध्ये यांच्याबाबत घडला असून, गतवर्षीच्या पीक नुकसानापोटी त्यांना केवळ केवळ ४९.२१ रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. तसा मेसेजेही त्यांना कंपनीकडून प्राप्त झाला आहे.

कोट: पीकविमा काढल्यानंतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास ७२ तासात कंपनीला कळविले जाते. आम्ही गतवर्षी पीकनुकसान झाल्यानंतर कपंनीला कळविले. त्यावर आता विमा मंजूर झाला असून, हजारो रुपये भरले असताना आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना कंपनीने केवळ ४९.२१ रुपये विम्यापोटी मंजूर केले आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूरथट्टा नव्हे, तर काय आहे.

- नितीन पा. ऊपाध्ये,

शेतकरी काजळेश्वर