शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला प्रलंबीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:03 IST

काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यात यंदाच्या हंगामात लाखावर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे आदेशही दिले. तथापि, तीन महिने उलटले असतानाही हजारो शेतकºयांना बियाणे बदलून मिळाले नाही किंवा मोबदलाही मिळालेला नाही. त्यातच काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. त्यामुळे लाखो शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे त्यांचे परिश्रम आणि खर्चात वाढ झालीच. शिवाय दुबार, तिबार पेरणीत वेळ गेल्याने उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या प्रकाराची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आणि पंचनाम्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता शेतकºयांना तात्काळ बियाणे बदलून पेरणी सोयीची करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यभरात कृषी विभागाने शेतकºयांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांचे सोपस्कार सुरूच ठेवले. त्यात काही कंपन्यांवर कोर्ट केसेस (न्यायालयीन खटले) दाखल केले आहेत. आता त्याचा निकाल लागण्यास बराच विलंब लागणार आहे. शिवाय उर्वरित हजारो शेतकºयांना अद्याप कंपनीकडून बदली बियाणेही देण्यात आलेले नाहीत आणि खरीप हंगाम संपत आला असताना शेतकºयांना बियाण्यांचा खर्च म्हणून मोबदलाही मिळालेला नाही. राज्यशासनाने या प्रकाराची दखल घेऊन शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करीत आहेत.

काजळेश्वर परिसरात यंदा ४० पेक्षा अधिक शेतकºयांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामेसुद्धा केले; परंतु आता सोयाबीन काढणीवर आले असताना शेतकºयांना बदली बियाणे मिळाले नाहीत किंवा संबंधित कंपनीकडून मोबदलाही मिळू शकला नाही.-नितिन उपाध्ये,शेतकरी, काजळेश्वर ता. कारंजा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती