शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला प्रलंबीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:03 IST

काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यात यंदाच्या हंगामात लाखावर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे आदेशही दिले. तथापि, तीन महिने उलटले असतानाही हजारो शेतकºयांना बियाणे बदलून मिळाले नाही किंवा मोबदलाही मिळालेला नाही. त्यातच काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. त्यामुळे लाखो शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे त्यांचे परिश्रम आणि खर्चात वाढ झालीच. शिवाय दुबार, तिबार पेरणीत वेळ गेल्याने उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या प्रकाराची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आणि पंचनाम्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता शेतकºयांना तात्काळ बियाणे बदलून पेरणी सोयीची करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यभरात कृषी विभागाने शेतकºयांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांचे सोपस्कार सुरूच ठेवले. त्यात काही कंपन्यांवर कोर्ट केसेस (न्यायालयीन खटले) दाखल केले आहेत. आता त्याचा निकाल लागण्यास बराच विलंब लागणार आहे. शिवाय उर्वरित हजारो शेतकºयांना अद्याप कंपनीकडून बदली बियाणेही देण्यात आलेले नाहीत आणि खरीप हंगाम संपत आला असताना शेतकºयांना बियाण्यांचा खर्च म्हणून मोबदलाही मिळालेला नाही. राज्यशासनाने या प्रकाराची दखल घेऊन शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करीत आहेत.

काजळेश्वर परिसरात यंदा ४० पेक्षा अधिक शेतकºयांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामेसुद्धा केले; परंतु आता सोयाबीन काढणीवर आले असताना शेतकºयांना बदली बियाणे मिळाले नाहीत किंवा संबंधित कंपनीकडून मोबदलाही मिळू शकला नाही.-नितिन उपाध्ये,शेतकरी, काजळेश्वर ता. कारंजा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती