शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला प्रलंबीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:03 IST

काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यात यंदाच्या हंगामात लाखावर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे आदेशही दिले. तथापि, तीन महिने उलटले असतानाही हजारो शेतकºयांना बियाणे बदलून मिळाले नाही किंवा मोबदलाही मिळालेला नाही. त्यातच काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. त्यामुळे लाखो शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे त्यांचे परिश्रम आणि खर्चात वाढ झालीच. शिवाय दुबार, तिबार पेरणीत वेळ गेल्याने उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या प्रकाराची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आणि पंचनाम्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता शेतकºयांना तात्काळ बियाणे बदलून पेरणी सोयीची करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यभरात कृषी विभागाने शेतकºयांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांचे सोपस्कार सुरूच ठेवले. त्यात काही कंपन्यांवर कोर्ट केसेस (न्यायालयीन खटले) दाखल केले आहेत. आता त्याचा निकाल लागण्यास बराच विलंब लागणार आहे. शिवाय उर्वरित हजारो शेतकºयांना अद्याप कंपनीकडून बदली बियाणेही देण्यात आलेले नाहीत आणि खरीप हंगाम संपत आला असताना शेतकºयांना बियाण्यांचा खर्च म्हणून मोबदलाही मिळालेला नाही. राज्यशासनाने या प्रकाराची दखल घेऊन शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करीत आहेत.

काजळेश्वर परिसरात यंदा ४० पेक्षा अधिक शेतकºयांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामेसुद्धा केले; परंतु आता सोयाबीन काढणीवर आले असताना शेतकºयांना बदली बियाणे मिळाले नाहीत किंवा संबंधित कंपनीकडून मोबदलाही मिळू शकला नाही.-नितिन उपाध्ये,शेतकरी, काजळेश्वर ता. कारंजा

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती