शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फळपीक विमाधारकांच्या माहितीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 14:54 IST

वाशिम: जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. यापैकी संत्रा, डाळींब व लिंबू पिकासाठी किती शेतकºयांनी विमा उतरविला, याची माहिती कृषी विभागाकडून संकलीत केली जात आहे. बँकांकडून दिरंगाई होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन होऊ शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले.आंबिया बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पाच, रिसोड तालुक्यातील चार,  मालेगाव तालुक्यातील सात,  मंगरूळपीर तालुक्यातील सहा, मानोरा तालुक्यातील चार तसेच कारंजा तालुक्यातील सहा अशा महसूल मंडळांचा समावेश आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती.डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील चार, मालेगाव तालुक्यातील एक, मंगरूळपीर तालुक्यातील सहा आणि मानोरा तालुक्यातील एका महसूल मंडळांचा समावेश होता. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर होती. आंबिया बहार लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील एकमेव पार्डी टकमोर  या महसूल मंडळाचा समावेश होता. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर होती. डाळींब तसेच लिंबू या पिकांसाठीची मुदत संपून १५ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी संपला आहे. तथापि, बँकांकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन झाले नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.  आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदतआंबा या पिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लाख २१ हजार रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता ६ हजार ५० रुपये विमा हप्ता शेतकºयांनी भरावयाचा आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती