शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांनो गहू, हरभरा पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:54 IST

Washim Agriculture News ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ही हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे. त्या खालोखाल गहू पिकाची पेरणी ही २१ हजार ७०२ हेक्टरवर झाली. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. गत तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, हळद, तूर आदी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत  असल्याचे दिसून येते. कीड नियंत्रणासाठी शेतकरी हे विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळच्या सुमारास धुके पडत असल्याने याचा फटकाही पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाजविदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसामुळे कपाशीचे नुकसान होऊ नये म्हणून कपाशीची फुटलेले बोंडे त्वरित वेचणी करावी. वांगे, टोमॅटो पिकांचे रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाले असल्यास स्थलांतरित करावे.

ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. मार्गदर्शनासाठी कृषी विभाग तत्पर आहे. - एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती