शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाशिम जिल्ह्यातील ४९१ गावांत स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 18:07 IST

वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीदर्शक अशा बैलबंडी, लेझिम पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देत गावकºयांचे लक्ष वेधून घेतले. सर्वसाधारणत: ग्रामीण भागात बºयाच प्रमाणात अस्वच्छता असल्याने विविध आजारांना जणू निमंत्रणच मिळते. ग्रामीण भागात सामाजिक आरोग्याचा संदेश देणे, दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचालयाचा नियमित वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप असून, आतापर्यंत ४९१ ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयांतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाºयांवर या ४९१ ग्रामपंचायतींमधील कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जिल्हयात कलापथकाव्दारे प्रबोधन करण्याबरोबरच लेझीम पथक, बैलबंडी अशा अस्सल ग्रामीण संस्कृतीदर्शक माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव यांच्यासह जि.प. सदस्य, पं.स. पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य, विभागप्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान