शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

स्वच्छ सर्वेक्षणात वाशिम जिल्हा‘ डेंजर झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:28 IST

राज्यात वाशिम जिल्हा ‘डेंजर झोन’ अर्थात सर्वात पिछाडीवर असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत तसेच स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यात राज्यात वाशिम जिल्हा ‘डेंजर झोन’ अर्थात सर्वात पिछाडीवर असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. स्वच्छता अ‍ॅपवर विभाग प्रमुखांना दहा हजार तर बीडीआेंना २० हजार प्रतिक्रिया नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले असून, उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २३ आॅगस्टपासून स्वच्छ सर्वेक्षण -२०१९ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता अ‍ॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तथापि, या जनजागृतीला अद्यापही वेग नसल्याने ५ सप्टेंबरपर्यंत राज्यात वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर होता. वाशिम जिल्ह्यात ५ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता अ‍ॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.स्वच्छतेसंदर्भात रँक ठरविण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गावात येऊन तपासणी करणार आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०१९ अंतर्गत मोबाईलवर नागरिकांचा फिडबॅक नोंदविण्याची कार्यवाहीदेखील केली जात आहे. यामध्ये वाशिम जिल्हा माघारल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी चांगलीच गांभीर्याने घेतली असून, विभाग प्रमुखांसह सर्व गटविकास अधिकाºयांना स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. १५ सप्टेबर २०१९ पर्यंत गटविकास अधिकाºयांना तालुक्यातून किमान २० हजार नागरिकांचे मोबाइलवर अभिप्राय (प्रतिक्रिया) नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले. तसेच विभाग प्रमुखांना १० हजार नागरिकांचे अभिप्राय नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्टपूर्ती न करणाºया अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.

स्वच्छता अ‍ॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया !स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ (ग्रामीण) अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रतिक्रियवर स्वच्छतेची रँक अवलंबून राहणार आहे. राज्यात ५ सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, ८१ हजार ६८५ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. पश्चिम वºहाडातील बुलडाणा जिल्हा १६ व्या क्रमांकावर असून ३५९४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. अकोला जिल्हा २३ व्या क्रमांकावर असून, १५४८ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या तर वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर अर्थात ३४ व्या क्रमांकावर असून, केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान