शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:19 IST

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.५५ टक्के  लागला आहे. अमरावती विभागात सलग तिसºया वर्षीही वाशिम जिल्हा प्रथम स्थानावर राहिला आला आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार९६० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.५५ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार ४३५ विद्यार्थ्यांमध्ये ९६१७ मुले व ६८१८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ९०.१८ तर मुलींची सरासरी टक्केवारी ९३.५५ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वाशिम तालुक्याचा ९३.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल मंगरूळपीर तालुका ९३.१८ टक्के, मानोरा तालुका ९३.१३ टक्के, रिसोड तालुका ९२.९५ टक्के, मालेगाव तालुका ८७.७५ टक्के तर कारंजा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८६.५२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. वाशिम तालुक्यात २६८३ मुले व १८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २४७९ मुले व १७३७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.४० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५६ अशी आहे. मालेगाव तालुक्यात १४३१ मुले व ८५५ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२३१ मुले व ७७५ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.०२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ अशी आहे. रिसोड तालुक्यात २८२९ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २६०६ मुले व १५१९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४१ अशी आहे. कारंजा तालुक्यात १२६२ मुले व ११६४ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १०४३ मुले व १०५६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १२१८ मुले व १०११ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १११९ मुले व ९५८ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.८७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.७६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२४१ मुले व ८१२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ११३९ मुले व ७७३ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.७८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.३० टक्के, कला शाखेचा ८६.९६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.०६ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८३.३२ टक्के निकाल लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परिक्षार्थींचा निकाल ४३.३३ टक्के लागला आहे. ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ७४६ मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली असून, ३९६ पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३२३ मुले आणि ७३ मुलींचा समावेश असून, मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ४३.४० तर मुलींची टक्केवारी ४३.४५ अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल