शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:19 IST

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.५५ टक्के  लागला आहे. अमरावती विभागात सलग तिसºया वर्षीही वाशिम जिल्हा प्रथम स्थानावर राहिला आला आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार९६० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९१.५५ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार ४३५ विद्यार्थ्यांमध्ये ९६१७ मुले व ६८१८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ९०.१८ तर मुलींची सरासरी टक्केवारी ९३.५५ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वाशिम तालुक्याचा ९३.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल मंगरूळपीर तालुका ९३.१८ टक्के, मानोरा तालुका ९३.१३ टक्के, रिसोड तालुका ९२.९५ टक्के, मालेगाव तालुका ८७.७५ टक्के तर कारंजा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८६.५२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. वाशिम तालुक्यात २६८३ मुले व १८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २४७९ मुले व १७३७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.४० तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५६ अशी आहे. मालेगाव तालुक्यात १४३१ मुले व ८५५ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२३१ मुले व ७७५ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.०२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ अशी आहे. रिसोड तालुक्यात २८२९ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २६०६ मुले व १५१९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.१२ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४१ अशी आहे. कारंजा तालुक्यात १२६२ मुले व ११६४ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १०४३ मुले व १०५६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १२१८ मुले व १०११ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १११९ मुले व ९५८ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.८७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.७६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२४१ मुले व ८१२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ११३९ मुले व ७७३ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.७८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.३० टक्के, कला शाखेचा ८६.९६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.०६ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८३.३२ टक्के निकाल लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परिक्षार्थींचा निकाल ४३.३३ टक्के लागला आहे. ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये ७४६ मुले आणि १६८ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ९१४ पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली असून, ३९६ पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३२३ मुले आणि ७३ मुलींचा समावेश असून, मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ४३.४० तर मुलींची टक्केवारी ४३.४५ अशी आहे.

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल