शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:01 IST

मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रारंभ झाला खरा; परंतू मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथील महोत्सव लांबणीवर पडला.रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी भागात राहणाºया नागरिकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाणी ‘रानभाजी महोत्सव २०२०’ साजरा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार  वाशिमचा अपवाद वगळता उर्वरीत पाच शहरांमध्ये तालुकास्तरावर ११ आॅगस्टपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना आणि पावसामुळे या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. मानोरा येथे रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांनी पाठ फिरविली. दुपारी दीड वाजेपर्यंतही अधिकारी किंवा पदाधिकारी महोत्सवस्थळी पोहचले नव्हते. बचत गटांनी रानभाजीचे स्टॉल लावले होते. परंतू, त्यांना शहरवासियांची प्रतिक्षा होती. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथे रानभाजी महोत्सव लांबणीवर पडला. दोन, तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी सांगितले. कारंजा येथे महोत्सवाचा शुभारंभ होताना, काही नागरिकांची उपस्थिती होती. परंतू, त्यानंतर स्टॉलवर फारसे कुणी नव्हते. मंगरूळपीर येथे महोत्सवाला बºयापैकी प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMangrulpirमंगरूळपीर