शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

By admin | Updated: April 17, 2017 02:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : रस्ता रुंदीकरणाचे काम, वृक्षतोड थांबविण्याची मागणी

वाशिम : शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. यासंदर्भात सिव्हिल लाइनसह अन्य भागातील नागरिकांनी वृक्ष वाचविण्यासाठी पुढाकार घेत शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रविवारीदेखील वृक्षप्रेमींनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वृक्ष वाचविण्याची मागणी केली.वाशिम शहरात रस्ता रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी मार्गालगत असलेली झाडे तोडली जाणार असल्याची माहिती आहे. गत दोन वर्षाआधी आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले, तेव्हादेखील त्या रस्त्यावरील ४० ते ५० झाडे कापण्यात आली होती. ते अद्याप लावण्यात आलेली नाही. आता पुन्हा आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन रस्त्यावरील झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. एकीकडे शासन कोट्यवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने याकडे जिल्हाधिकारी तसेच संबंधितानी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिव्हिल लाइन भागातील रहिवासी तथा जय बजरंग मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. डॉ. बाबासाहेब अांबेडकर चौक ते सिव्हिल लाइन, जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान रस्ता रुंदीकरण काम करताना वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी केली.तसेच सिव्हिल लाइन भागातील रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने होणाऱ्या वृक्षतोडीला थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन १५ एप्रिल रोजी राजे उदाराम कॉलनी, सिव्हिल लाइन भागातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनासह संबंधितांना दिले आहे.रस्ता रुंदीकरण कार्यक्रमांतर्गत सिव्हिल लाइन भागात रेखांकन झाले आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपासून झाडे आहेत. जवळपास विविध १६० वृक्ष या रस्त्यावर असून, या वृक्षाची तोड रस्ता रुंदीकरणासाठी होऊ शकते, अशी शक्यता निवेदनातून नागरिकांनी वर्तविली. वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली. राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. शहरातील आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन या भागातील नगर परिषद प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार रस्ता रुंदीकरण, सौंदर्यीकरण करताना वृक्षांची कत्तल होणार आहे. या बाबीचा निषेध करत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.