शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:30 IST

ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाची स्थापना करण्यात येत आहे. ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे.राष्ट्रीय ग्राम जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रत्येक गावामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राम संघाच्या स्थापना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते. या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामसंघाची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक ग्रामसंघांची स्थापना झाली आहे. महिला व बालकल्याण अंतर्गत सेवा, योजना व सामाजिक प्रश्नाबाबत चर्चा घडवून महिलांच्या माध्यमातून काही अनिष्ट बाबीवर प्रतिबंध घालण्याबाबत जनजागृती केली जात आहे. सोमवारी पार्डी टकमोर येथे ग्रामसंघाची सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषेदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण यांनी स्त्रीभ्रूण हत्या टाळणे, शिक्षण, आरोग्य ,महिला बचत गट तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलीचे प्रमाणात होत असलेली घट इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी बचत गटाचे समन्वयक, अंगणवाडी सेविका व ग्रामसंघातील महिलांची उपस्थिती होती. संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिम