शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात स्थापन होणार बालहक्क रक्षण समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:44 IST

ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हयात तीन टप्प्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) आणि युनिसेफने पुढाकार घेतल्याची माहिती ‘व्हीएसटीएफ’चे जिल्हा समन्वयक वासूदेव ढोणे यांनी दिली.वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील २५ जिल्हे व ८५० गावांमध्ये सलग तीन महिने विशेष मोहीम राबवून लोकांना मुख्यत: बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. ३० आॅगष्टपर्यत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित केले जातील. तसेच मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात बालहक्क रक्षण समित्या स्थापन करुन कार्य सुरू करतील. हे कार्यकर्ते बालकांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करतील.११ आॅक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालीका दिनापासून सुरु होणाºया दुसºया टप्प्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून युनिसेफ अधिकाऱ्यांच्या सहभागातून बालकांच्या समस्यांवर चर्चेसाठी शाळा व बचतगटांच्या बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये वाढत्या वयानुसार बालकांमध्ये होणाºया बदलाच्या माहितीसह युनिसेफने तयार केलेली माहितीपत्रके, पुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना देवून बालहक्क आणि बालविवाह या विषयावर तयार केलेली विविध माहितीपट दाखविले जातील.१४ नोव्हेंबरपासून सुरु होणाºया तिसºया व शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यासह कायदे, इतर उपाययोजनांची माहिती दिल्या जाईल.बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची, याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठीची साह्यसेवा मिळवण्यासाठी तसेच तक्रार नोंदविण्यासाठीच्या दूरध्वनी क्रमांकांची त्यांना माहिती दिली जाणार आहे. युनिसेफ आणि व्हीएसटीएफच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविल्या जाणाºया विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात बालहक्क आणि बालविवाह या गंभीर मुद्यांबाबत भविष्यात योग्य कृती करण्याची मानसिकता ग्रामीण भागात पक्की होईल. याअंतर्गत कारंजातील ५ व मालेगाव तालुक्यातील २ अशा ७ ग्रामपंचायतींमध्ये समित्या गठीत केल्या जाणार आहे.- वासूदेव ढोणेजिल्हा समन्वयक, ‘व्हीएसटीएफ’, वाशिम

टॅग्स :washimवाशिम