शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
4
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
5
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
6
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
7
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
8
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
9
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
10
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
11
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
12
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
13
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
14
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
15
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
16
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
17
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
18
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
19
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?

वाशिम जिल्ह्यात स्थापन होणार बालहक्क रक्षण समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:44 IST

ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हयात तीन टप्प्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) आणि युनिसेफने पुढाकार घेतल्याची माहिती ‘व्हीएसटीएफ’चे जिल्हा समन्वयक वासूदेव ढोणे यांनी दिली.वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील २५ जिल्हे व ८५० गावांमध्ये सलग तीन महिने विशेष मोहीम राबवून लोकांना मुख्यत: बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. ३० आॅगष्टपर्यत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित केले जातील. तसेच मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात बालहक्क रक्षण समित्या स्थापन करुन कार्य सुरू करतील. हे कार्यकर्ते बालकांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करतील.११ आॅक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालीका दिनापासून सुरु होणाºया दुसºया टप्प्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून युनिसेफ अधिकाऱ्यांच्या सहभागातून बालकांच्या समस्यांवर चर्चेसाठी शाळा व बचतगटांच्या बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये वाढत्या वयानुसार बालकांमध्ये होणाºया बदलाच्या माहितीसह युनिसेफने तयार केलेली माहितीपत्रके, पुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना देवून बालहक्क आणि बालविवाह या विषयावर तयार केलेली विविध माहितीपट दाखविले जातील.१४ नोव्हेंबरपासून सुरु होणाºया तिसºया व शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यासह कायदे, इतर उपाययोजनांची माहिती दिल्या जाईल.बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची, याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठीची साह्यसेवा मिळवण्यासाठी तसेच तक्रार नोंदविण्यासाठीच्या दूरध्वनी क्रमांकांची त्यांना माहिती दिली जाणार आहे. युनिसेफ आणि व्हीएसटीएफच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविल्या जाणाºया विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात बालहक्क आणि बालविवाह या गंभीर मुद्यांबाबत भविष्यात योग्य कृती करण्याची मानसिकता ग्रामीण भागात पक्की होईल. याअंतर्गत कारंजातील ५ व मालेगाव तालुक्यातील २ अशा ७ ग्रामपंचायतींमध्ये समित्या गठीत केल्या जाणार आहे.- वासूदेव ढोणेजिल्हा समन्वयक, ‘व्हीएसटीएफ’, वाशिम

टॅग्स :washimवाशिम