शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

वाशिम जिल्ह्यात स्थापन होणार बालहक्क रक्षण समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:44 IST

ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हयात तीन टप्प्यात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित करण्यासह बालहक्क रक्षण समित्यांचे गठण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) आणि युनिसेफने पुढाकार घेतल्याची माहिती ‘व्हीएसटीएफ’चे जिल्हा समन्वयक वासूदेव ढोणे यांनी दिली.वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील २५ जिल्हे व ८५० गावांमध्ये सलग तीन महिने विशेष मोहीम राबवून लोकांना मुख्यत: बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. ३० आॅगष्टपर्यत चालणाऱ्या पहिल्या टप्प्यात ग्रामसभेच्या माध्यमातून विविध ठराव पारित केले जातील. तसेच मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेचे कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात बालहक्क रक्षण समित्या स्थापन करुन कार्य सुरू करतील. हे कार्यकर्ते बालकांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करतील.११ आॅक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालीका दिनापासून सुरु होणाºया दुसºया टप्प्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करून युनिसेफ अधिकाऱ्यांच्या सहभागातून बालकांच्या समस्यांवर चर्चेसाठी शाळा व बचतगटांच्या बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये वाढत्या वयानुसार बालकांमध्ये होणाºया बदलाच्या माहितीसह युनिसेफने तयार केलेली माहितीपत्रके, पुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना देवून बालहक्क आणि बालविवाह या विषयावर तयार केलेली विविध माहितीपट दाखविले जातील.१४ नोव्हेंबरपासून सुरु होणाºया तिसºया व शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यासह कायदे, इतर उपाययोजनांची माहिती दिल्या जाईल.बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची, याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठीची साह्यसेवा मिळवण्यासाठी तसेच तक्रार नोंदविण्यासाठीच्या दूरध्वनी क्रमांकांची त्यांना माहिती दिली जाणार आहे. युनिसेफ आणि व्हीएसटीएफच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविल्या जाणाºया विशेष मोहिमेमुळे ग्रामीण भागात बालहक्क आणि बालविवाह या गंभीर मुद्यांबाबत भविष्यात योग्य कृती करण्याची मानसिकता ग्रामीण भागात पक्की होईल. याअंतर्गत कारंजातील ५ व मालेगाव तालुक्यातील २ अशा ७ ग्रामपंचायतींमध्ये समित्या गठीत केल्या जाणार आहे.- वासूदेव ढोणेजिल्हा समन्वयक, ‘व्हीएसटीएफ’, वाशिम

टॅग्स :washimवाशिम