शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मालेगाव नगर पंचायतचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:10 IST

मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव  ( वाशिम ) : येथील नगरपंचायतच्या मुख्याधिकाºयांचे कामकाज रिसोड पालिकेच्या मुख्याधिकाºयांकडे अनेक महिन्यांपासून सोपविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी सोनू बळी यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.  येत्या ५ दिवसांत दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहेपालकमंत्री, जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मागील अनेक महिन्यांपासून मालेगावला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रहिवासी दाखल्याची जन्ममृत्यूच्या नोंदी, घराचे जागेचा ८ अ , प्रॉपर्टी कार्ड आदी कामासाठी १५ ते २० दिवस लागत आहेत. या अगोदरचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची रिसोड येथे बदली झाली. तेव्हापासून ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून मालेगावचे कामकाज सांभाळत आहेत. त्यामुळे मालेगावकरांना त्रास सहन करावा लागत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास रखडला असून सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ कामासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेषत: शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल,रमाई घरकुल योजना आदी कामे रखडली आहेत.आजमितीला शहरात सुरु असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांवर कुणाचाही वचक उरला नसल्याचे नमूद आहे. मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचााºयांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. ही बाब लक्षात घेऊन येत्या ५ दिवसांत नविन मुख्य धिकारी न दिल्यास उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशाराही निवेदनाद्वारे बळी यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव