शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

खरबूज-टरबूजांच्या मळ्यात चराईसाठी सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 15:56 IST

पिकांतून उत्पादनाची आशा नसल्याने हताश शेतकºयांनी या पिकांत गुरे चराईसाठी सोडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : यंदाच्या उन्हाळी हंगामाच्या मध्यंतरीच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रात लागवड केलेली खरबूज, काकडी, टरबुजाची पिके सुकली आणि शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता या पिकांतून उत्पादनाची आशा नसल्याने हताश शेतकºयांनी या पिकांत गुरे चराईसाठी सोडली आहेत. त्याचा फायदा परिसरातील पशूपालकांना मोठा आधार झाला आहे. कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या पुलाच्या खाली अडाण नदीच्या पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरबुज, टरबूज आणि काकडी या फळपिकांची लागवड केली जाते. नदी पात्राच्या गाळपेर क्षेत्रातील या पिकांना नदीपात्रातील पाण्याचाच आधार असतो. त्यापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळतेच शिवाय परिसरातील शेतमजुरांच्या हाताला कामही मिळते. यंदाही या नदीच्या पात्रात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात फळपिकांची लागवड केली. तथापि, यंदा उन्हाळ्याची चाहुल लागताच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रातील शेतकºयांची बहरलेली फळपिके संकटात सापडली. अशावेळी शेतकºयांनी नदीपात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्याचा आधारे कशीबशी पिके वाढविली. त्यापासून जेमतेम उत्पादन झाले; परंतु यातून खर्चही वसुल झाला नाही. आता नदीपात्रातील खड्ड्यांतूनही पिके जगविणे कठीण झाले असून, ही पिके सुकत चालली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पिके जगविण्याचा प्रयत्नच सोडला आणि गुरांच्या चराईसाठी मोकळे रान केले. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी, चाराटंचाईच्या काळात परिसरातील गुरांचे पोट यामुळे भरू लागल्याने पशूपालकांची मोठी समस्याही सुटली आहे. त्यातच या नदीपात्रातील गाळमिश्रीत पाणीही गुरांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती