शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाण्याच्या बाबतीत गावे समृद्ध व्हावी-  डॉ. अविनाश पौळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:42 IST

पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने यापूर्वी घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेऊन ३० गुण मिळविले, अशा राज्यातील १,१३८ गावांमध्ये आता समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात १ मे २०२० पासून होणार आहे. यानिमित्त वाशिममध्ये आले असता, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

समृद्ध गाव स्पर्धेची मूळ संकल्पना काय ?राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी यापूर्वी तीन वर्षे ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्यात आली. त्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने प्रामुख्याने शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील १,१३८ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली. त्याचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरणाºया गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेतून नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार?जल व मृद संधारण, जल व्यवस्थापन, वृक्षलागवड, संगोपन व जंगलाची वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम आधार तयार करणे, या सहा घटकांवर आधारित ही स्पर्धा १ मे पासून संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.

समृद्ध गाव स्पर्धेबाबत गावकºयांना प्रशिक्षण दिले जाणार का?हो, १ मे २०२० पासून राज्यभरातील १,१३८ गावांमध्ये सुरू होणाºया समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष द्यायचे, याबाबत गावकºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानुषंगारे १२ केंद्रांवर प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या जातील. प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, रोजगार सेवक, महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा