शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पाण्याच्या बाबतीत गावे समृद्ध व्हावी-  डॉ. अविनाश पौळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:42 IST

पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने यापूर्वी घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेऊन ३० गुण मिळविले, अशा राज्यातील १,१३८ गावांमध्ये आता समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात १ मे २०२० पासून होणार आहे. यानिमित्त वाशिममध्ये आले असता, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पौळ यांच्याशी साधलेला हा संवाद...

समृद्ध गाव स्पर्धेची मूळ संकल्पना काय ?राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी यापूर्वी तीन वर्षे ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्यात आली. त्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने प्रामुख्याने शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्यातील १,१३८ गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली. त्याचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊन विजयी ठरणाºया गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेतून नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार?जल व मृद संधारण, जल व्यवस्थापन, वृक्षलागवड, संगोपन व जंगलाची वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम आधार तयार करणे, या सहा घटकांवर आधारित ही स्पर्धा १ मे पासून संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.

समृद्ध गाव स्पर्धेबाबत गावकºयांना प्रशिक्षण दिले जाणार का?हो, १ मे २०२० पासून राज्यभरातील १,१३८ गावांमध्ये सुरू होणाºया समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत नेमक्या कुठल्या घटकांवर लक्ष द्यायचे, याबाबत गावकºयांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानुषंगारे १२ केंद्रांवर प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या जातील. प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, रोजगार सेवक, महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा