शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

उंटाच्या तस्करीची टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:30 IST

हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे.

- शिखरचंद बागरेचा  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उंटाच्या तस्करीची टोळी पुन्हा सक्रीय झाली असुन वाशिम शहरातुन मंगळवारी पहाटे हिंगोलीच्या दिशेने उंटाचा कळप रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर उंट तेलंगनात कत्तलीसाठी जात असतांना संशय वर्तविण्यात येत असुन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी याबाबत जिल्ह्यातील ठाणेदारांना सुचना दिलेल्या आहेत.नागपुर ते औरंगाबाद दु्रतगती महामार्गावरुन किन्हीराजा येथून वाशिमच्याा दिशेने २५ ते ३० उंटाचा कळप रवाना झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सदर उंटाचा कळप कन्हेरगाव, हिंगोली, नांदेडच्या दिशेने महामार्गावरील एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळाली. याबाबत वाशिम ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपने यांना माहिती मिळाल्यानंतर चौकशीकरिता कन्हेरगावच्या दिशेने पथक रवाना करीत उंटांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. राजस्थान राज्यातील उंट हा प्राणी महाराष्ट्राच्या वातावरणात जगु शकत नाही तसेच महाराष्ट्रात त्याला प्रवेशाची मुभा नसतांना सुध्दा राजस्थान, मध्य प्रदेश या दोन्ही राज्ये सोडून वाशिम जिल्ह्यापर्यंत उंटाचा जथ्था कसा पोहोचला हा एक मोठा प्रश्न आहे. राजस्थानातील काही तस्करी करणारे लोक, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना हाताशी धरुन पैशाची आमिश दाखवुन उंटांची चोरी केल्यानंतर त्यांना थेट तेलंगना राज्यातील हैद्राबाद शहरात रस्त्याने पायी पाठविले जातात, अशी माहिती आहे. हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे. मागील वर्षी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातुर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटाचा कळप अडवुन पातुर पोलिस स्टेशनमध्ये संबंधीतांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये बोरकर यांच्या वनराई गोशाळेत या उंटांना ठेवण्यात आले होते. तर असाच एक २० उंटाचा कळप मालेगाव येथील सुभाषचंद्र जैन यांच्या गोशाळेत ठेवण्याचा आदेश दिला होता. सदर दोन्ही प्रकरणात हैद्रबाद येथील जीवदया प्रेमी सुरेंद्र भंडारी, दिनेश अपलीया, माहिप जैन, वनराई गोरक्षण संस्थेचे श्रीकांत बोरकर व विजय बोरकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते. पातुर येथील सदर घटनेमुळे राजस्थानातील सदर उंटाची चोरी करुन तस्करी करणाºया टोळीने आता आपला मार्ग बदलला असुन पातुर मार्गे न येता नागपुर - औरंगाबाद दृ्रुतगती महामार्गावरुन किन्हीराजा मार्गे वाशिम शहरातून वर्दळ नसलेल्या रस्त्याव्दारे हिंगोलीच्या रस्त्याने हळुहळु आपला मोर्चा वळविला असल्याचे मंगळवारच्या घटनेवरून दिसून येते.

राजस्थान राज्यातुन वाशिम मार्गे तेलंगना राज्यात जाणाºया उंटाच्या कळपाबाबत माहिती मिळाली असुन याची जिल्ह्याातील सर्व ठाणेदारांना आपण सुचना दिलेल्या आहेत.उंटांना हैद्राबाद येथे नेवुन त्याची कत्तल केल्या जाते अशी माहिती जीवदया प्रेमीकडून मिळाल्यामुळेच आपण याबाबत ठाणेदारांना अशा कळपांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम