शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

उंटाच्या तस्करीची टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:30 IST

हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे.

- शिखरचंद बागरेचा  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उंटाच्या तस्करीची टोळी पुन्हा सक्रीय झाली असुन वाशिम शहरातुन मंगळवारी पहाटे हिंगोलीच्या दिशेने उंटाचा कळप रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर उंट तेलंगनात कत्तलीसाठी जात असतांना संशय वर्तविण्यात येत असुन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी याबाबत जिल्ह्यातील ठाणेदारांना सुचना दिलेल्या आहेत.नागपुर ते औरंगाबाद दु्रतगती महामार्गावरुन किन्हीराजा येथून वाशिमच्याा दिशेने २५ ते ३० उंटाचा कळप रवाना झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सदर उंटाचा कळप कन्हेरगाव, हिंगोली, नांदेडच्या दिशेने महामार्गावरील एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळाली. याबाबत वाशिम ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपने यांना माहिती मिळाल्यानंतर चौकशीकरिता कन्हेरगावच्या दिशेने पथक रवाना करीत उंटांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. राजस्थान राज्यातील उंट हा प्राणी महाराष्ट्राच्या वातावरणात जगु शकत नाही तसेच महाराष्ट्रात त्याला प्रवेशाची मुभा नसतांना सुध्दा राजस्थान, मध्य प्रदेश या दोन्ही राज्ये सोडून वाशिम जिल्ह्यापर्यंत उंटाचा जथ्था कसा पोहोचला हा एक मोठा प्रश्न आहे. राजस्थानातील काही तस्करी करणारे लोक, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना हाताशी धरुन पैशाची आमिश दाखवुन उंटांची चोरी केल्यानंतर त्यांना थेट तेलंगना राज्यातील हैद्राबाद शहरात रस्त्याने पायी पाठविले जातात, अशी माहिती आहे. हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे. मागील वर्षी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातुर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटाचा कळप अडवुन पातुर पोलिस स्टेशनमध्ये संबंधीतांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये बोरकर यांच्या वनराई गोशाळेत या उंटांना ठेवण्यात आले होते. तर असाच एक २० उंटाचा कळप मालेगाव येथील सुभाषचंद्र जैन यांच्या गोशाळेत ठेवण्याचा आदेश दिला होता. सदर दोन्ही प्रकरणात हैद्रबाद येथील जीवदया प्रेमी सुरेंद्र भंडारी, दिनेश अपलीया, माहिप जैन, वनराई गोरक्षण संस्थेचे श्रीकांत बोरकर व विजय बोरकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते. पातुर येथील सदर घटनेमुळे राजस्थानातील सदर उंटाची चोरी करुन तस्करी करणाºया टोळीने आता आपला मार्ग बदलला असुन पातुर मार्गे न येता नागपुर - औरंगाबाद दृ्रुतगती महामार्गावरुन किन्हीराजा मार्गे वाशिम शहरातून वर्दळ नसलेल्या रस्त्याव्दारे हिंगोलीच्या रस्त्याने हळुहळु आपला मोर्चा वळविला असल्याचे मंगळवारच्या घटनेवरून दिसून येते.

राजस्थान राज्यातुन वाशिम मार्गे तेलंगना राज्यात जाणाºया उंटाच्या कळपाबाबत माहिती मिळाली असुन याची जिल्ह्याातील सर्व ठाणेदारांना आपण सुचना दिलेल्या आहेत.उंटांना हैद्राबाद येथे नेवुन त्याची कत्तल केल्या जाते अशी माहिती जीवदया प्रेमीकडून मिळाल्यामुळेच आपण याबाबत ठाणेदारांना अशा कळपांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम