शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिरपूरच्या पक्क्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात चालला 'गजराज' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:21 IST

शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देया मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के  अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. ग्रामपंचायत, भूमीअभिलेख विभाग, तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे येथे विविध धार्मिक उत्सवात येणाºया भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन माजी जि.प. सदस्य मो. इमदाद बागवान यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन सादर करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सुनावणी केली. यात शिरपूर येथील अतिक्रमण महिनाभरात हटवून शिरपूरचा विकास आराखडा तीन महिन्यांत तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तथापि, निर्धारित मुदतीत हे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी नोटीसही बजावली. त्यानंतर प्रशासनाने भूमीअभिलेख विभागाकाडून गावातील अतिक्रमणाचे मोजमाप करून घेण्यात आले; परंतु या प्रक्रियेचे शुल्क ग्रामपंचायतने न भरल्याने भूमीअभिलेख विभागाने मोजणी अहवाल दिला नाही. त्यामुळे कोणाचे नेमके किती अतिक्रमण आहे. हे कळायला ग्रामपंचायतकडे मार्गच नव्हता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम रखडली आणि लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ संभ्रमात पडले. अखेर ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून भूमीअभिलेख विभागाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. तो अहवाल गुरुवार ६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आणि शुक्रवार ७ सप्टेंबरपासून ग्रामपंचायतने महसूल, भूमीअभिलेख व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के  अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन