शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

घरकुल, शौचालयासाठी दलालांकडून लाभार्थींची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 16:31 IST

आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.

रिसोड : घरकुल, शौचालयाचे अनुदान काढून देतो, असे म्हणत ग्रामीण भागात दलालांकडून लाभार्थींची लूट सुरू असल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते तसेच घरकुल योजनेसाठी सव्वा ते दीड लाखादरम्यान अनुदान मिळते. रिसोड तालुक्यात अनेक लाभार्थींना घरकुल व शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. ही संधी साधून ग्रामीण भागात दलालांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याचे समोर येत आहे. घरकुल व शौचालयाचे अनुदान काढून देतो तसेच नव्याने घरकुल, शौचालयसुद्धा मंजूर करून घेतो, असे आमिष दाखवून लाभार्थींकडून दोन ते दहा हजार रुपये उकळले जात आहेत. ज्या लाभार्थींचे नाव अनुदानाच्या यादीत आहे, अशा लाभार्थींच्या घरी जाऊन तुमचे नाव यादीत असून, लवकरच अनुदान काढून देतो, कागदपत्रात काही त्रुटी असल्या तरीसुद्धा वरिष्ठांशी बोलून तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा करून देतो, असे आमिष दलालांकडून लाभार्थींना दाखविले जात आहे. याकडे पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.

काही दलालांकडून लाभार्थींना आमिष दाखवून लुबाडणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. लाभार्थींनी घरकुल व शौचालय अनुदानासाठी कोणत्याही दलालाशी संपर्क साधू नये तसेच कुणालाही पैसे देऊन नये. घरकुल, शौचालयसंदर्भात प्रशासनाशी थेट संपर्क साधावा. - गिता संजय हरिमकरसभापती, पंचायत समिती रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड