शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील पुलांचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:45 IST

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांवर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे काम अतिशय संथ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांवर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे काम अतिशय संथ असून, पुलांच्या कामांसाठी वळणमार्गांवर केवळ मातीचा वापर झाल्याने मंगळवारी रात्री अवकाळी पावसानंतर चिखल तयार होऊन येथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. विविध ठिकाणी सुमारे दोन तास वाहनांची मोठी रांग उभीर होती. जिल्ह्यात पाच मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, याची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा अद्ययावत होणार असल्याने नागरिकांत समाधानाचेही वातावरण आहे; परंतु कामाची संथगती वाहनचालकांसह प्रवासीवर्गासाठी त्रासदायक ठरत आहे. मार्गाचे ेकाम करण्यापूर्वी पुलाची उभारणी आवश्यक असल्याने या मार्गावर विविध ठिकाणी येत असलेल्या नाल्यांवर पुलांची कामे करण्यात येत आहेत. यासाठी पूर्वीचे पूल खोदण्यात आले. अशात वाहतुक ठप्प होऊ नये म्हणून वळणमार्गही तयार करण्यात आले; परंतु हे वळणमार्ग करताना त्यावर केवळ माती आणि मुरमाचा वापर झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे या पुलांवर ठिकठिकाणी खोळंबा झाला. जवळपास दोन तास  वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या वळणामार्गावरील चिखलात वाहनाची चाके फसून अपघाताची होण्याची भिती असल्याने काही वाहनधारकांनी मार्ग बदलणेच पसंत केल्याचेही दिसले. येत्या दीड महिन्यात सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता पुलांची ही कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग