शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

 पूल वाहून गेला; नाल्याच्या पाण्यातून शेतमालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 17:39 IST

The bridge was swept away पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील इंझोरी-पिंपळगाव या पाणंद रस्त्यावरील पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे ३०पेक्षा शेतकºयांची वहिवाटच अडचणीत आली असून, सोयाबीनसह इतर शेतमालाची काढणी केल्यानंतर नाल्यातील खाच खळग्यातून सायकलने किंवा डोक्यावर साहित्याची ने-आण करावी लागत आहे. तथापि, या पुलाची जबाबदारी असलेला पुनवर्सन विभागाने अद्याप (४ आॅक्टोबर) त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती केली नाही. मानोरा तालुक्यातील म्हसणी नजिक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाकडे जाणाºया इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकºयांची वहिवाट बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकºयांची पंचाईत झाली. वारंवार या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर या पाणंद रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पुलाची उभारणी केली.  साधारण अडीचवर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांची वहिवाट बंद झाली. आता येथून कुठलीच वाहने नेता येत नाहीत, तर शेतात पायी जाण्यासाठीही शेतकरी, शेतमजूर महिलांना नाल्यात उतरून पाण्यात चालत जावे लागते. शिवाय इतर रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने शेतकºयांना शेतात जावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता शेतमाल काढणीनंतर शेतकºयांना शेतमाल घरी आणने कठीण झाले असून, नाल्याच्या  पाण्यातून शेतकरी सायकलने शेतमालाची वाहतूक करीत असल्याचे गंभीर चित्र येथे पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी