शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

शौचालय बांधकामाच्या प्रोत्साहन अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:26 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही.१५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किमान एका महिन्याच्या आत संबंधित लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही. या बाबीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी १५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या. आतापर्यंत प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या लाभार्थीना अनुदान वितरणासाठी २०१२ च्या बेसलाईन सर्वे यादीनुसार लाभार्थी पात्र आहे की नाही याची खात्री करावी, शौचालय बांधकामासंदर्भात पडताळणी करून तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर देयके सादर करावे, अशा सूचना दिल्या. १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण कार्यवाही करून कुणीही पात्र लाभार्थी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, दप्तर दिरंगाईमुळे  लाभार्थी हा अनुदानापासून वंचित राहिल्यास तालुकास्तरीय यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला. १५ आॅगस्टची अंतिम मुदत संपल्यानंतर, अनुदान वितरणासाठी कुणी लाभार्थी शिल्लक राहिला नसल्याबाबतचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करावे, अशा सूचना मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान