शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

शौचालय बांधकामाच्या प्रोत्साहन अनुदानापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:26 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही.१५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करून पात्र लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. ३१ मार्च २०१८ पूर्वी १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किमान एका महिन्याच्या आत संबंधित लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. चार महिन्याचा कालावधी झाल्यानंतरही काही लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही. या बाबीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी १५ आॅगस्ट २०१८ पूर्वी लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना केल्या. आतापर्यंत प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या लाभार्थीना अनुदान वितरणासाठी २०१२ च्या बेसलाईन सर्वे यादीनुसार लाभार्थी पात्र आहे की नाही याची खात्री करावी, शौचालय बांधकामासंदर्भात पडताळणी करून तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर देयके सादर करावे, अशा सूचना दिल्या. १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण कार्यवाही करून कुणीही पात्र लाभार्थी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, दप्तर दिरंगाईमुळे  लाभार्थी हा अनुदानापासून वंचित राहिल्यास तालुकास्तरीय यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला. १५ आॅगस्टची अंतिम मुदत संपल्यानंतर, अनुदान वितरणासाठी कुणी लाभार्थी शिल्लक राहिला नसल्याबाबतचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र १६ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करावे, अशा सूचना मीणा यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान