शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By संतोष वानखडे | Updated: August 22, 2023 15:34 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. 

वाशिम : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सोमवारी (दि.२१) दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, मोहन जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, राजेश सोनखासकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, सखाराम मुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे व दिगंबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची सर्व विभागांनी यादी निश्चित करावी, अशा सूचना दिल्या. 

पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वाशिमात

सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत वाशिम येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा पूर्वतयारीला लागल्याचे दिसून येते.

सर्व विभागांनी राबविण्यात येणाऱ्या योजना निश्चित करून किती लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभ देता येईल याची माहिती उपलब्ध करून द्यावी. वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनांपासून या उपक्रमादरम्यान एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्या लाभार्थ्यांना या उपक्रमादरम्यान आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे, त्याची माहिती व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक विहित नमुन्यात नमूद करावे, असे निर्देशही दिले. सभेला सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम