शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाच किटकनाशकांवर बंदी; वापर न करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 16:43 IST

या किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी शुक्रवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: किटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊ नये म्हणून प्रोफेनोफोस व सौपरमेथ्रीन, फिप्रोनील व इमोडॅक्लोप्रीड, एॅफिसेट, डिफेन्थोरोन, मोनोक्रोटोफॉस या पाच किटकनाशकांवर कृषी विभागाने बंदी आणली असून, या किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी शुक्रवारी केले.पिकांवरील किडींचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या कीटकनाशकांच्या वापर केला जातो. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. किटकनाशक फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. जहाल किटकनाशकामुळे होणारी संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी कृषी विभागाने पाच किटकनाशकांवर बंदी आणली आहे. प्रोफेनोफोस व सौपरमेथ्रीन, फिप्रोनील व इमोडॅक्लोप्रीड, एॅफिसेट, डिफेन्थोरोन, मोनोक्रोटोफॉस ही पाच किटकनाशके कृषी सेवा केंद्रात ठेवू नये तसेच शेतकऱ्यांनीदेखील या किटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करू नये, असे आवाहन कृषी अधिकारी भद्रोड यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी