शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबतच्या ‘एलडीएम’च्या निर्देशांना बँकांच्या ‘वाकुल्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:13 IST

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत.

ठळक मुद्देकर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही.शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने (एलडीएम) तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत फर्मान सोडूनही त्याचे पालन न झाल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे आटोपून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली आहे. बँकांकडून पीक कर्जाची रक्कम हाती पडल्यास बि-बियाणे, खत यासह इतर आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही. अशातच शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वस्तूनिष्ठ वार्तांकन केले. त्याची दखल घेत जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील संबंधित सर्व बँकांना तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत कळविले होते. मात्र, त्यास कुठल्याच बँकेने जुमानले नाही. त्यामुळे अखेर १७ मे रोजी जिल्ह्यातील बँकांना पत्र पाठवून शेतकºयांकडून होत असलेल्या तक्रारींबाबत अवगत करून यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयांकडून कुठले दिशा-निर्देश आहेत, त्याबाबत कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बँकांनी अवलंबिलेल्या असहकार धोरणाविरूद्ध जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून प्रश्न तत्काळ निकाली न निघाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा काही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी