शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबतच्या ‘एलडीएम’च्या निर्देशांना बँकांच्या ‘वाकुल्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:13 IST

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत.

ठळक मुद्देकर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही.शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

वाशिम : ऐन तोंडावर असलेल्या खरीप हंगामातील खर्चाच्या तरतूदीसाठी शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, ‘माझ्याकडे कुठल्याही बँकेचे कर्ज नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही संबंधित बँका शेतकऱ्यांना इतर १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’ आणायला लावत आहेत. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने (एलडीएम) तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत फर्मान सोडूनही त्याचे पालन न झाल्याने हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे आटोपून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली आहे. बँकांकडून पीक कर्जाची रक्कम हाती पडल्यास बि-बियाणे, खत यासह इतर आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरित करणाºया बँकांकडून मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात असल्याच्या शेतकऱ्यां च्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या निर्देशानंतरही पीक कर्ज वितरित करण्याची गती अद्याप वाढलेली नाही. अशातच शेतकऱ्यां कडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतरही भर उन्हात १९ बँकांकडून ‘नो-ड्यूज’चा सही व शिक्का आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वस्तूनिष्ठ वार्तांकन केले. त्याची दखल घेत जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील संबंधित सर्व बँकांना तोंडी निर्देश देवून ‘नो-ड्यूज’ न घेण्याबाबत कळविले होते. मात्र, त्यास कुठल्याच बँकेने जुमानले नाही. त्यामुळे अखेर १७ मे रोजी जिल्ह्यातील बँकांना पत्र पाठवून शेतकºयांकडून होत असलेल्या तक्रारींबाबत अवगत करून यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयांकडून कुठले दिशा-निर्देश आहेत, त्याबाबत कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बँकांनी अवलंबिलेल्या असहकार धोरणाविरूद्ध जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून प्रश्न तत्काळ निकाली न निघाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा काही शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी