शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे प्रत्येक घरापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचतील - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:16 IST

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आर्थिक समावेशकतेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोस्ट अकाऊंट नागपूर विभागाचे संचालक एस. के. पांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रितेश मलिक, भूपेश थुलकर, तेजराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.आठवले पुढे म्हणाले, टपाल खाते व पोस्टमन यांनी आजपर्यंत देशभरातील नागरिकांचे सुख-दु:खाचे संदेश नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मनीआॅर्डर, बचत खाते, आरडीसारख्या आर्थिक सुविधा पुरवून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, वंचित घटकांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नात आता टपाल खाते सहभागी होत असून प्रत्येक पोस्टमन आता बँकिंग सुविधा घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज तंत्रज्ञानाच्या युगात आॅनलाईन स्वरूपातील बँकिंग वाढले असल्याचे सांगून आठवले म्हणाले, कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या माध्यमातून सुद्धा आधुनिक, अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच बँक खाते उघडणे करणे तसेच बँकेचे व्यवहार करण्याची प्रक्रिया सोपी राहणार आहे. याकरिता पोस्टमन नागरिकांच्या घरापर्यंत जावून या सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’चे क्यू-आर कार्ड व स्पेशिअल कव्हरचे अनावरण यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ खातेधारक नागरिकांना क्यू-आर कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी वाशिम पोस्ट शाखेचे विपणन अधिकारी सुनील लखाने, पोस्ट मास्तर एस. जी. गर्दे, डाक निरीक्षक नरेश शिंदे आदी उपस्थित होते. संचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPost Officeपोस्ट ऑफिसRamdas Athawaleरामदास आठवले