शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे प्रत्येक घरापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचतील - रामदास आठवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:16 IST

‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आर्थिक समावेशकतेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे १ सप्टेंबर रोजी आयोजित ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या (आयपीपीबी) वाशिम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोस्ट अकाऊंट नागपूर विभागाचे संचालक एस. के. पांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रितेश मलिक, भूपेश थुलकर, तेजराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.आठवले पुढे म्हणाले, टपाल खाते व पोस्टमन यांनी आजपर्यंत देशभरातील नागरिकांचे सुख-दु:खाचे संदेश नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मनीआॅर्डर, बचत खाते, आरडीसारख्या आर्थिक सुविधा पुरवून जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, वंचित घटकांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नात आता टपाल खाते सहभागी होत असून प्रत्येक पोस्टमन आता बँकिंग सुविधा घेऊन लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ ही लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज तंत्रज्ञानाच्या युगात आॅनलाईन स्वरूपातील बँकिंग वाढले असल्याचे सांगून आठवले म्हणाले, कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’च्या माध्यमातून सुद्धा आधुनिक, अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच बँक खाते उघडणे करणे तसेच बँकेचे व्यवहार करण्याची प्रक्रिया सोपी राहणार आहे. याकरिता पोस्टमन नागरिकांच्या घरापर्यंत जावून या सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’चे क्यू-आर कार्ड व स्पेशिअल कव्हरचे अनावरण यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक’ खातेधारक नागरिकांना क्यू-आर कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी वाशिम पोस्ट शाखेचे विपणन अधिकारी सुनील लखाने, पोस्ट मास्तर एस. जी. गर्दे, डाक निरीक्षक नरेश शिंदे आदी उपस्थित होते. संचालन चाफेश्वर गांगवे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPost Officeपोस्ट ऑफिसRamdas Athawaleरामदास आठवले