शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

 वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:58 IST

वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता.

वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५.१८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला असून, सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  वाशिम जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी व पंचायत विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी मिळाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळपिकांचेही नुकसान झाले. एकूण  २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाईचा १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी प्राप्त होताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने हा निधी तहसिल कार्यालयांकडे सुपूर्द केला.

वाशिम तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १ कोटी ४९ लाख ३० हजार ६३० रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात एक कोटी ५६ लाख ७८ हजार ४७० रुपये, रिसोड तालुक्यात ११ कोटी १४ लाख ९२ हजार २८० रुपये, मंगरूळपीर तालुक्यात २८ लाख ५४ हजार ७२० रुपये, मानोरा तालुक्यात ४३ लाख २० हजार ९०० रुपये असा एकूण १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधी दिला जाणार असल्याने गावपातळीवर तलाठ्यांमार्फत संबंधित शेतकºयांकडून बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. संबंधित शेतकºयांना तहसिल कार्यालयातदेखील बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती देता येणार आहे. बँक खाते व आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तातडीने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी