शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

 वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:58 IST

वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता.

वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५.१८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला असून, सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  वाशिम जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी व पंचायत विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी मिळाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळपिकांचेही नुकसान झाले. एकूण  २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाईचा १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी प्राप्त होताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने हा निधी तहसिल कार्यालयांकडे सुपूर्द केला.

वाशिम तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १ कोटी ४९ लाख ३० हजार ६३० रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात एक कोटी ५६ लाख ७८ हजार ४७० रुपये, रिसोड तालुक्यात ११ कोटी १४ लाख ९२ हजार २८० रुपये, मंगरूळपीर तालुक्यात २८ लाख ५४ हजार ७२० रुपये, मानोरा तालुक्यात ४३ लाख २० हजार ९०० रुपये असा एकूण १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधी दिला जाणार असल्याने गावपातळीवर तलाठ्यांमार्फत संबंधित शेतकºयांकडून बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. संबंधित शेतकºयांना तहसिल कार्यालयातदेखील बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती देता येणार आहे. बँक खाते व आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तातडीने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी