शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

 वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 16:58 IST

वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता.

वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी १५.१८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला असून, सदर नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  वाशिम जिल्ह्यातील रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला आदींचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल, कृषी व पंचायत विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी मिळाला आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी मिळाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळपिकांचेही नुकसान झाले. एकूण  २२ हजार १३३ शेतकऱ्यांच्या १९ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन दरबारी पाठविला होता. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला नुकसानभरपाईचा १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी प्राप्त होताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तातडीने हा निधी तहसिल कार्यालयांकडे सुपूर्द केला.

वाशिम तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी १ कोटी ४९ लाख ३० हजार ६३० रुपयाचा निधी देण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यात एक कोटी ५६ लाख ७८ हजार ४७० रुपये, रिसोड तालुक्यात ११ कोटी १४ लाख ९२ हजार २८० रुपये, मंगरूळपीर तालुक्यात २८ लाख ५४ हजार ७२० रुपये, मानोरा तालुक्यात ४३ लाख २० हजार ९०० रुपये असा एकूण १५ कोटी १८ लाख ७७ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधी दिला जाणार असल्याने गावपातळीवर तलाठ्यांमार्फत संबंधित शेतकºयांकडून बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. संबंधित शेतकºयांना तहसिल कार्यालयातदेखील बँक खाते व आधार क्रमांकाची माहिती देता येणार आहे. बँक खाते व आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तातडीने नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी