शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शाळांसाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:22 IST

Awaiting Gram Panchayat's proposal for schools : १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या ७ जुलैच्या परिपत्रकानुसार ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ग्रामपंचायतींचे ठराव मागण्यात आले आहेत; परंतु १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आठवी ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याची शक्यताच धुसर झाल्याचे दिसत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी शासन निर्देशानुसार सरपंचांच्या अध्यक्षतेखालील तलाठी, शाळा समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुख, वैद्यकीय  अधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या ग्रामस्तर समितीची स्थापना करण्याचे निर्देशही जि. प. शिक्षण विभागाने दिले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ग्रामपंचायतींनी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या; परंतु चार दिवस उलटले असताना जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातून कारखेडा येथील एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार की नाही, अशी शंकाच उपस्थित होत आहे. 

निर्जंतुकीकरणासह लसीकरणाला होणार विलंबग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही संबंधित शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यासह लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतरही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत; परंतु ग्रामपंचायतींची प्रस्ताव प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तर समितीचा ठराव आणि ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ही प्रक्रिया सुरू असून, पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव प्राप्त होताच पडताळणी करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.                      - रमेश तांगडे,   माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :Schoolशाळाwashimवाशिमgram panchayatग्राम पंचायत