शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शाळांसाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:22 IST

Awaiting Gram Panchayat's proposal for schools : १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या ७ जुलैच्या परिपत्रकानुसार ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ग्रामपंचायतींचे ठराव मागण्यात आले आहेत; परंतु १५ जुलैपर्यंतच ही प्रक्रिया पार पाडायची असताना, केवळ एका ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आठवी ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याची शक्यताच धुसर झाल्याचे दिसत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी शासन निर्देशानुसार सरपंचांच्या अध्यक्षतेखालील तलाठी, शाळा समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुख, वैद्यकीय  अधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या ग्रामस्तर समितीची स्थापना करण्याचे निर्देशही जि. प. शिक्षण विभागाने दिले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ग्रामपंचायतींनी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या; परंतु चार दिवस उलटले असताना जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातून कारखेडा येथील एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार की नाही, अशी शंकाच उपस्थित होत आहे. 

निर्जंतुकीकरणासह लसीकरणाला होणार विलंबग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही संबंधित शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यासह लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतरही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत; परंतु ग्रामपंचायतींची प्रस्ताव प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तर समितीचा ठराव आणि ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ही प्रक्रिया सुरू असून, पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव प्राप्त होताच पडताळणी करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.                      - रमेश तांगडे,   माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :Schoolशाळाwashimवाशिमgram panchayatग्राम पंचायत