शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:06 IST

नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी(वाशिम) :  मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर गेला. यात नाल्याच्या काठावरील शेतजमीन पिकांसह खरडून गेली. आता या नुकसानापोटी पीकविमा मिळावा म्हणून शेतकरी शासनाच्या पीकविमा प्रतिनिधींकडे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी पीकविमा काढूनही नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्यशासनासह कृषी विभागाकडून प्रधारनमंत्री पीक विमा योजना  ही शेतकºयांसाठी वरदान असल्याचा गाजावाजा केला जातो. त्यावर विश्वास ठेवून लाखो शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवितात. त्यासाठी नियमानुसार रकमेचा भरणाही करतात. यंदाही जिल्ह्यातील लाखावर शेतकºयांनी दिल्ली येथील अ‍ॅग्रीकल्चर कंपनीकडे पीकविमा काढला. त्यात मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील शेकडो शेतकºयांचा समावेश आहे. पीकविमा योजनेच्या नियमानुसार शेतकºयांच पिकांचे नैसर्गिक आपत्तीने अतोनात नुकसान झाल्यानंतर त्याची पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून पाहणी केली जाते. त्यासाठी शेतकºयांना पीकविमा कंपनीकडे ठरलेल्या मुदतीत तक्रारही नोंदवावी लागते. आता २६ आणि २७ सप्टेंबर रोजी इंझोरी परिसरातील नाल्याला मोठा पूर गेला. त्यामुळे या नाल्याच्या काठावरील अनेक शेतकºयांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. अनेक शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पीकविमा कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर शेतकºयांनी या संदर्भात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; परंतु वारंवार प्रयत्न करूनही टोलफ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आनंद तोतला या शेतकºयाचा टोलफ्री क्रमांकावर संपर्क झाला; परंतु त्यांनी पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याची तक्रार केली असता, वेळ नसल्याचे सांगून तक्रार नोंदविण्यास प्रतिनिधीने नकार दिला.

शेतकºयांची पीक नुकसानाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ होत असेल, तर संबंधित तालुका समन्वयकांवर नियमानुसार कारवाई करू, तसेच शेतकºयांच्या तक्रारी तातडीने नोंदवून घेण्याची व्यवस्था करू. -ज्ञानेश्वर बोदडेजिल्हा समन्वयकअ‍ॅग्रीकल्चर इंन्शूरन्स कंपनी नवी दिल्ली

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी