शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:13 IST

हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्यात आले असून यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्यूत पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’व्दारे पंप सुरू करता यावा, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी मोटारपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्याचा प्रकार अवलंबिला आहे; मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘ऑटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सद्या ग्रामीण भागात ठराविक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विजपुरवठा सुरळित होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटव्दारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरूस्त होत असल्याने मोटारपंपाचे ‘ऑटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविलेले आहेत. अधूनमधून खंडित होणारा वीज पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर ‘ऑटो स्विच’व्दारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मोटारपंप सुरू होत असल्याने रोहित्रावर ताण येऊन ते जळण्याचा प्रकार वाढला आहे. शेतकºयांनी ‘ऑटो स्विच’ काढून टाकायला हवे.- व्ही.बी. बेथारिया,अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण