शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कृषि विकास योजनांतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:20 IST

वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्दे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºयांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेश वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात जवळपास ७ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत.या अभियानातून चालू वर्षात जिल्ह्यातील १२० गावांमध्ये २ हजार ४४० कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ७५८ शेततळी पूर्ण झाली आहेत. धडक सिंचन व मनरेगा योजनेतून गेल्या दोन ते अडीच वर्षात पूर्ण झालेल्या सुमारे ५ हजार सिंचन विहिरींमुळे संरक्षित सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. शेतकरी गटांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्य शासनाने गट शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, वाशिम जिल्ह्यातीलसहा गटांची या योजनेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा तुरीची आधारभूत दराने पणन विभागामार्फत खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून याकरिता प्रकल्प सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे. लोणी येथील श्री सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी १० कोटी १५ लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर आहे. त्यासाठी निविदा निश्चितीची कार्यवाही पूर्ण झाल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºयांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८