शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विकास योजनांतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:20 IST

वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्दे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºयांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेश वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात जवळपास ७ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत.या अभियानातून चालू वर्षात जिल्ह्यातील १२० गावांमध्ये २ हजार ४४० कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात ७५८ शेततळी पूर्ण झाली आहेत. धडक सिंचन व मनरेगा योजनेतून गेल्या दोन ते अडीच वर्षात पूर्ण झालेल्या सुमारे ५ हजार सिंचन विहिरींमुळे संरक्षित सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. शेतकरी गटांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी राज्य शासनाने गट शेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, वाशिम जिल्ह्यातीलसहा गटांची या योजनेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा तुरीची आधारभूत दराने पणन विभागामार्फत खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत बोनससह ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून याकरिता प्रकल्प सल्लागार नियुक्तीची कार्यवाही सुरु आहे. लोणी येथील श्री सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी १० कोटी १५ लक्ष रुपयांचा आराखडा मंजूर आहे. त्यासाठी निविदा निश्चितीची कार्यवाही पूर्ण झाल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाºयांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८