शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अटल विश्वकर्मा योजनेत साडेपाच हजार कामगारांची नोंदणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:40 IST

वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. दरम्यान, या योजनेत वाशिम जिल्ह्यातील साडेपाच हजार कामगारांना सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी पी.आर. महल्ले यांनी ११ आॅगस्ट रोजी दिली.शासनाने पंतप्रधान आवास योजनेत बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्यासोबतच ते व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना २ जून २०१७ पासून लागू केली. याशिवाय अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक सहाय्य, आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिली ते सातवी, ७५ टक्के उपस्थिती असल्यास प्रतिवर्षी अडीच हजार, आठवी ते दहावी पाच हजार, दहावी, बारावीत ५० टक्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्यास १० हजारांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक मदत केली जाणार आहे. दरम्यान, योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असून त्यात सहभागी होण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी कार्यालयीन वेळेत सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पी.आर. महल्ले यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना