शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेततळ्यांचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:10 IST

वाशिम: राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत २०१७ मध्ये करण्यात आलेल्या शेततळ्यांपैकी ५ टक्के भौतिक तपासणी आणि मूल्यमापन त्रयस्थ संस्थेद्वारे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलाभ घेणाऱ्या शेतकºयांची संपूर्ण माहिती संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींना देण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत. २०१७ मध्ये कामे पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी ५ टक्के शेततळ्यांचे मूल्यमापन ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था पुणे’च्यावतीने करण्यात येत आहे. शासन स्तरावर शेततळ्यांपासून शेतकºयांना झालेला फायदा आणि आवश्यकता याची पडताळणी करण्यात येणार आहे.

वाशिम: राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत २०१७ मध्ये करण्यात आलेल्या शेततळ्यांपैकी ५ टक्के भौतिक तपासणी आणि मूल्यमापन त्रयस्थ संस्थेद्वारे करण्यात येत आहे. या अंतर्गत योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकºयांची संपूर्ण माहिती संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींना देण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत. या तपासणीनंतर शेततळ्यांचा फायदा आणि आवश्यकता याचा अंदाज घेतला जाणार आहे.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत प्रवासाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाले असल्याने पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये जलसंपदा व रोहयोच्या मंत्र्यांसोबत राज्याचा दौरा केला असता, पावसाचा खंड व पाणीटंचाईमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेततळे उपलब्ध करण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. या मागणीचा विचार करून राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या शेततळ्यांचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फ त करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. या निर्देशानुसार २०१७ मध्ये कामे पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी ५ टक्के शेततळ्यांचे मूल्यमापन ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था पुणे’च्यावतीने करण्यात येत आहे. या अंतर्गत शेततळे लाभार्थींचा ओळख क्रमांक, गाव, तालुका आणि जिल्हा याबाबतची यादी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था पुणे यांना राज्य स्तरावरून देण्यात आली आहे. सदर लाभार्थींची उर्वरित माहिती कृषी विभागाकडून संबंधित संस्थेस देण्याचे निर्देश असल्याने सर्वच जिल्हा स्तरावरून ही माहिती पुरविण्यात येत आहे. या अंतर्गत मूल्यमापनासाठी निवडलेल्या शेततळ्यांच्या लाभार्थींची नावे न बदलण्याचे आणि दुसºया लाभार्थींची भौतिक तपासणी व मूल्यमापन करण्यासाठी संबंधित संस्थेकडून न करण्याचे निर्देशही कृषी विभागाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे मूल्यमापन ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मूल्यमापन प्रक्रिया १० जून २०१८ पूर्वी पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधित संस्थेला योग्य सहकार्य करण्यात येत आहे. या मूल्यमापन प्रक्रियेनंतर शासन स्तरावर शेततळ्यांपासून शेतकºयांना झालेला फायदा आणि आवश्यकता याची पडताळणी करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी